शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एसटीच्या ५० बसेस विजेवर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिवसेंदिवस डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे, एसटी महामंडळाने पर्यायी सुविधा म्हणून विजेवर ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दिवसेंदिवस डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे, एसटी महामंडळाने पर्यायी सुविधा म्हणून विजेवर चालणाऱ्या बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळातर्फे प्रत्येक विभागातून या बसेसच्या मागणीबाबत प्रस्ताव मागविण्यात येत असून, जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याबाबत महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या विजेवर चालणाऱ्या बसेसमुळे महामंडळाचा डिझेलवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.

कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटली असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महामंडळाकडे पैसे नाहीत. कोरोनामुळे तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात गेले आहे. त्यात डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढणारे दर आणि अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने हा तोटा कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या प्रत्येक विभागाला या बसेस चालविण्याबाबत अभिप्राय व बसेसची संख्या मागविली असून, जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याची तयारी दर्शविली आहे. चार्जिंग केल्यानंतर, ही बस ३०० किलोमीटरपर्यंत धावणार असून, चार्जिंगसाठी ज्या आगारातर्फे या बसेस चालविल्या जातील, त्या आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.

इन्फो :

या मार्गावर धावणार बसेस

जळगाव : चाळीसगाव

जळगाव : पाचोरा

जळगाव : धुळे

जळगाव : रावेर

जळगाव : चोपडा

इन्फो :

आणखी दोन महिने लागणार

महामंडळातर्फे विजेवर चालविणाऱ्या बसेसचा निर्णय घेण्यात आला असून, या बसेस चालविण्याबाबत प्रत्येक विभागातर्फे माहितीदेखील मागविण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव विभागानेही महामंडळाकडे आपला अहवाल पाठविला आहे. सर्व प्रक्रिया होऊन, साधारणत: दोन महिन्यानंतर विजेवर चालणाऱ्या बसेस रस्त्यावर धावणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आगारांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन

महामंडळाच्या जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याची तयारी दाखविली असून, ज्या आगारांना या बसेस चालविण्यासाठी देण्यात येतील. त्या त्या आगारामध्ये चार्जिंग स्टेशन लावण्यात येणार आहेत. जर प्रत्येक आगारांना बसेस दिल्या तर प्रत्येक आगारामध्ये हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

खर्चात होणार बचत

महामंडळाच्या सध्या ताफ्यात असलेल्या सर्व बसेस या डिझेलवर चालणाऱ्या असून, डिझेलसाठी दररोज लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, विजेवर चालणाऱ्या या ५० बसेसमुळे डिझेलची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्नातून येणारा पैसा हा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होणार असून, कर्मचाऱ्यांचीही आर्थिक अडचण दूर होणार आहे.

इन्फो :

महामंडळाने विजेवर चालणाऱ्या बसेस चालविण्याचा निर्णय खूप चांगला आहे. या निर्णयामुळे डिझेलची बचत होऊन प्रदूषण कमी होणार आहे. जळगाव विभागातून ५० बसेस चालविण्यात येणार आहे.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग