शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात एसटीच्या ५० बसेस विजेवर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिवसेंदिवस डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे, एसटी महामंडळाने पर्यायी सुविधा म्हणून विजेवर ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दिवसेंदिवस डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे, एसटी महामंडळाने पर्यायी सुविधा म्हणून विजेवर चालणाऱ्या बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळातर्फे प्रत्येक विभागातून या बसेसच्या मागणीबाबत प्रस्ताव मागविण्यात येत असून, जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याबाबत महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या विजेवर चालणाऱ्या बसेसमुळे महामंडळाचा डिझेलवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.

कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटली असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महामंडळाकडे पैसे नाहीत. कोरोनामुळे तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात गेले आहे. त्यात डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढणारे दर आणि अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने हा तोटा कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या प्रत्येक विभागाला या बसेस चालविण्याबाबत अभिप्राय व बसेसची संख्या मागविली असून, जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याची तयारी दर्शविली आहे. चार्जिंग केल्यानंतर, ही बस ३०० किलोमीटरपर्यंत धावणार असून, चार्जिंगसाठी ज्या आगारातर्फे या बसेस चालविल्या जातील, त्या आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.

इन्फो :

या मार्गावर धावणार बसेस

जळगाव : चाळीसगाव

जळगाव : पाचोरा

जळगाव : धुळे

जळगाव : रावेर

जळगाव : चोपडा

इन्फो :

आणखी दोन महिने लागणार

महामंडळातर्फे विजेवर चालविणाऱ्या बसेसचा निर्णय घेण्यात आला असून, या बसेस चालविण्याबाबत प्रत्येक विभागातर्फे माहितीदेखील मागविण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव विभागानेही महामंडळाकडे आपला अहवाल पाठविला आहे. सर्व प्रक्रिया होऊन, साधारणत: दोन महिन्यानंतर विजेवर चालणाऱ्या बसेस रस्त्यावर धावणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आगारांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन

महामंडळाच्या जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याची तयारी दाखविली असून, ज्या आगारांना या बसेस चालविण्यासाठी देण्यात येतील. त्या त्या आगारामध्ये चार्जिंग स्टेशन लावण्यात येणार आहेत. जर प्रत्येक आगारांना बसेस दिल्या तर प्रत्येक आगारामध्ये हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

खर्चात होणार बचत

महामंडळाच्या सध्या ताफ्यात असलेल्या सर्व बसेस या डिझेलवर चालणाऱ्या असून, डिझेलसाठी दररोज लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, विजेवर चालणाऱ्या या ५० बसेसमुळे डिझेलची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्नातून येणारा पैसा हा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होणार असून, कर्मचाऱ्यांचीही आर्थिक अडचण दूर होणार आहे.

इन्फो :

महामंडळाने विजेवर चालणाऱ्या बसेस चालविण्याचा निर्णय खूप चांगला आहे. या निर्णयामुळे डिझेलची बचत होऊन प्रदूषण कमी होणार आहे. जळगाव विभागातून ५० बसेस चालविण्यात येणार आहे.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग