शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्याना ५ ते ६ तास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर चांगलच परिणाम झाला. मुंबईकडून येणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना जळगाव स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. तसेच दुसरीकडे मंगळवारी रात्रीचा मुंबईकडे जाणारा विदर्भ एक्स्प्रेसही दोन तास उशिरा धावल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली दिसून आली.

रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्यरात्रीचा हा ब्लॉक असल्याने मुंबईहुन जळगावकडे येणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल व महानगरी एक्स्प्रेस या सर्व सुपरफास्ट गाड्या रात्री बाराच्या आत मुंबई येथून वेळापत्रकाप्रमाणे निघणे आवश्यक होते. मात्र, मेगाब्लॉक मुळे या सर्व गाड्या कल्याण स्टेशनच्या अलीकडे रखडल्या. मेगाब्लॉकचे काम संपल्यानंतरच या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे पर्यायाने जळगावला पहाटेच्या वेळी येणाऱ्या या गाड्या बुधवारी दुपारी जळगाव मध्ये दाखल झाल्या.

इन्फो :

मुंबईकडून येणाऱ्या या गाड्या आल्या विलंबाने

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या तीन सुपरफास्ट गाड्या लेट झाल्या. यामध्ये (गाडी क्रमांक ०२१९३) महानगरी एक्स्प्रेस ही गाडी साडे पाच तास विलंबाने धावली. या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सहाची असतांना,ती दुपारी साडेबारा वाजता जळगाव स्टेशनावर आली. तसेच (गाडी क्रमांक ०२५३८) कुशीनगर एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सात वाजेची असतांना, ही गाडी दुपारी एक वाजता जळगावला आली. तर (गाडी क्रमांक ०२१४१) पाटली पुत्र एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी पावणे सहाची असतांना, ही गाडी दुपारी बारा वाजता जळगावात आली. तब्बल सहा तास ही गाडी लेट धावली.

इन्फो :

विदर्भ एक्स्प्रेसही खोळंबला

या कामामुळे मंगळवारी रात्री मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आल्यानंतर विदर्भ एक्स्प्रेस मात्र दोन तास विलंबाने मुंबईकडे रवाना करण्यात आली. जळगावला ही गाडी तिच्या वेळेनुसार रात्री पावणे बारा वाजता न येता, मध्यरात्री अडीच वाजता आल्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.