शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्याना ५ ते ६ तास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर चांगलच परिणाम झाला. मुंबईकडून येणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना जळगाव स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. तसेच दुसरीकडे मंगळवारी रात्रीचा मुंबईकडे जाणारा विदर्भ एक्स्प्रेसही दोन तास उशिरा धावल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली दिसून आली.

रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्यरात्रीचा हा ब्लॉक असल्याने मुंबईहुन जळगावकडे येणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल व महानगरी एक्स्प्रेस या सर्व सुपरफास्ट गाड्या रात्री बाराच्या आत मुंबई येथून वेळापत्रकाप्रमाणे निघणे आवश्यक होते. मात्र, मेगाब्लॉक मुळे या सर्व गाड्या कल्याण स्टेशनच्या अलीकडे रखडल्या. मेगाब्लॉकचे काम संपल्यानंतरच या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे पर्यायाने जळगावला पहाटेच्या वेळी येणाऱ्या या गाड्या बुधवारी दुपारी जळगाव मध्ये दाखल झाल्या.

इन्फो :

मुंबईकडून येणाऱ्या या गाड्या आल्या विलंबाने

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या तीन सुपरफास्ट गाड्या लेट झाल्या. यामध्ये (गाडी क्रमांक ०२१९३) महानगरी एक्स्प्रेस ही गाडी साडे पाच तास विलंबाने धावली. या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सहाची असतांना,ती दुपारी साडेबारा वाजता जळगाव स्टेशनावर आली. तसेच (गाडी क्रमांक ०२५३८) कुशीनगर एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सात वाजेची असतांना, ही गाडी दुपारी एक वाजता जळगावला आली. तर (गाडी क्रमांक ०२१४१) पाटली पुत्र एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी पावणे सहाची असतांना, ही गाडी दुपारी बारा वाजता जळगावात आली. तब्बल सहा तास ही गाडी लेट धावली.

इन्फो :

विदर्भ एक्स्प्रेसही खोळंबला

या कामामुळे मंगळवारी रात्री मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आल्यानंतर विदर्भ एक्स्प्रेस मात्र दोन तास विलंबाने मुंबईकडे रवाना करण्यात आली. जळगावला ही गाडी तिच्या वेळेनुसार रात्री पावणे बारा वाजता न येता, मध्यरात्री अडीच वाजता आल्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.