शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्याना ५ ते ६ तास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर चांगलच परिणाम झाला. मुंबईकडून येणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना जळगाव स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. तसेच दुसरीकडे मंगळवारी रात्रीचा मुंबईकडे जाणारा विदर्भ एक्स्प्रेसही दोन तास उशिरा धावल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली दिसून आली.

रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्यरात्रीचा हा ब्लॉक असल्याने मुंबईहुन जळगावकडे येणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल व महानगरी एक्स्प्रेस या सर्व सुपरफास्ट गाड्या रात्री बाराच्या आत मुंबई येथून वेळापत्रकाप्रमाणे निघणे आवश्यक होते. मात्र, मेगाब्लॉक मुळे या सर्व गाड्या कल्याण स्टेशनच्या अलीकडे रखडल्या. मेगाब्लॉकचे काम संपल्यानंतरच या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे पर्यायाने जळगावला पहाटेच्या वेळी येणाऱ्या या गाड्या बुधवारी दुपारी जळगाव मध्ये दाखल झाल्या.

इन्फो :

मुंबईकडून येणाऱ्या या गाड्या आल्या विलंबाने

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या तीन सुपरफास्ट गाड्या लेट झाल्या. यामध्ये (गाडी क्रमांक ०२१९३) महानगरी एक्स्प्रेस ही गाडी साडे पाच तास विलंबाने धावली. या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सहाची असतांना,ती दुपारी साडेबारा वाजता जळगाव स्टेशनावर आली. तसेच (गाडी क्रमांक ०२५३८) कुशीनगर एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सात वाजेची असतांना, ही गाडी दुपारी एक वाजता जळगावला आली. तर (गाडी क्रमांक ०२१४१) पाटली पुत्र एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी पावणे सहाची असतांना, ही गाडी दुपारी बारा वाजता जळगावात आली. तब्बल सहा तास ही गाडी लेट धावली.

इन्फो :

विदर्भ एक्स्प्रेसही खोळंबला

या कामामुळे मंगळवारी रात्री मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आल्यानंतर विदर्भ एक्स्प्रेस मात्र दोन तास विलंबाने मुंबईकडे रवाना करण्यात आली. जळगावला ही गाडी तिच्या वेळेनुसार रात्री पावणे बारा वाजता न येता, मध्यरात्री अडीच वाजता आल्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.