शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

जीएमसीमधील ४८ मृत्यूंच्या नोंदीच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

स्टार : 729 पोर्टलवर केवळ ९९८ मृतांची नोंद : तर सार्वजनिकरित्या ९५० मृतांची संख्या जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क ...

स्टार : 729

पोर्टलवर केवळ ९९८ मृतांची नोंद : तर सार्वजनिकरित्या ९५० मृतांची संख्या जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४४० मृत्यू झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून दररोज जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या जाहीर केली जात आहे. सर्वाधिक ९५० मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून पोर्टलवर जाहीर होणाऱ्या मृत्यू व प्रसार माध्यमांसाठी दररोज सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात येणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत आढळून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सार्वजनिकरीत्या जाहीर केलेल्या आकडेवारीत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, पोर्टल वर मात्र ९९८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे ४८ मृतांची आकडेवारी सार्वजनिकरीत्या का जाहीर करण्यात आली नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

जिल्ह्यासह राज्यात देखील कोरोनामुळे मृत होणाऱ्या आकडेवारीत लपवाछपवी होत असल्याचा आरोप होत आहे. जळगाव शहरातील स्मशानभूमीत दररोज अंत्यसंस्कार होणाऱ्यांची संख्या व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून जाहीर होणाऱ्या मृतांच्या संख्येत देखील मोठी तफावत आढळत आहे. त्यात आता पोर्टलवर ९९८ मृत्यूची नोंद व सार्वजनिकरित्या जाहीर होणाऱ्या प्रसिद्धी पत्रकावर ९५० मृतांची संख्या असल्याने ४८ मृत्यू प्रसारमाध्यमांसाठी व सार्वजनिक रित्या का जाहीर केले जात नाही ? असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर देखील प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट होताना दिसून येत नाही. पोर्टलवर जाहीर करण्यात येणारी आकडेवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलच असून संपूर्ण जिल्ह्याच्या आकडेवारीवर देखील मोठी तफावत असण्याची शक्यता आता निर्माण होत आहे.

ही पहा तफावत

शासकीय महाविद्यालयात झालेले मृत्यू -९५०

पोर्टलवर नोंद - ९९८

सर्वाधिक बळी शहरात

जिल्ह्यात एकूण २४४० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे जळगाव शहरात झाले आहेत. जळगाव शहरात एकूण ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्याखालोखाल ३२० जणांचा मृत्यू भुसावळ तालुक्यात झाले आहे.

तर बसू शकतो फटका

१. पोर्टलवर किंवा सार्वजनिकरीत्या जाहीर होणाऱ्या मृतांच्या संख्येत तफावत आढळल्यास किंवा मृत्यूची संख्या लपवली गेल्यास, त्याचा परिणाम कोरोना वरील उपाययोजनांवर होऊ शकतो.

२.मृत्यूची संख्या वाढल्यास राज्य व केंद्र शासनाकडून संबंधित जिल्ह्यात तात्काळ उपाययोजना यासाठी नियोजन करता येऊ शकते, मात्र ही गंभीर परिस्थिती लपवली गेल्यास त्याचा परिणाम अजून गंभीर होण्याची शक्यता निर्माण होते.

३. शहरातील नेरी नाका स्मशान भूमीत दररोज ४० हून अधिक जणांनी वर अंत्यसंस्कार केले जात आहेत.मात्र, प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार त्यात पाच ते सहा रुग्णच कोरोना बाधित असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ही स्मशानभूमी कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आली आहे.

सारीच्या रुग्णांचाही समावेश

- जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असल्याने, प्रशासनाकडून महिनाभरापासून कोरोना मृतांचा संख्या सोबतच सारी मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आता जाहीर केली जात आहे.

- तसेच अनेक रुग्ण हे कोरोना वर मात केल्यानंतर दगावत असल्याने अशा मृतांची संख्या ही कोरोना मृतांमध्ये केली जात नाही.

मनपा वॉररूम

- कोरोना वरील उपाययोजनांसाठी मनपा प्रशासनाने वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त केले आहे.

- अँटिजन टेस्ट, कोरोना सेंटर, घरोघरी जाऊन रुग्णांची नोंदणी व तपासणी करणे, यासह शहरात होणाऱ्या मृत्यूंची संख्या जमा करून वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्याचे काम मनपा प्रशासनाकडून केले जात आहे. यासाठी मनपा प्रशासनाची वॉररूम रात्रंदिवस काम करत आहे.