शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

मेगाब्लॉकच्या पहिल्या दिवशी ४० टक्के काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST

दिवसभरात सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. ...

दिवसभरात सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी मेगाब्लॉकच्या या कामाला सुरूवात झाली. या मेगा ब्लॉकच्या काळात जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बदल तर काही ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा टाकण्यात येत आहे. तर या नविन सिग्नल यंत्रणेवरून सुरत मार्गाकडे जाणाऱ्या गाड्या ‘टर्मिनेट’ होण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी आठपर्यंत हे काम चालणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे रेल्वे स्टेशनच्या हद्दीतुन जाणाऱ्या सर्व गाड्या ताशी ३० किमी वेगाने अर्थात अत्यंत संथ गतीने धावल्या.

इन्फो :

कर्मचाऱ्यांनी पार पाडली सिग्नल यंत्रणेची भुमिका

रेल्वे प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत, साधारणत : दोन किलोमीटर पर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. या दोन किलोमीटरच्या रेड सिग्नल दाखवून, सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी उभे राहुन, रेल्वे गाड्यांना मार्ग दाखविला.

इन्फो :

एडीआरएम यांनी केली कामाची पाहणी

सकाळी मेगाब्लॉकच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर भुसावळ विभागाचे एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांनी जळगावी येऊन, या मेगाब्लॉकच्या कामाची ठिकाणी एक तास पाहणी केली. यावेळी त्यांनी सिग्नल यंत्रणेचे तांत्रिक काम चोख पद्धतीने पार पाडण्याच्या सुचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी जळगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक अमरचंद अगरवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.

इन्फो :

रेल्वे गेट बंद असल्याने हजारो वाहनधारकांची गैरसोय

तिसऱ्या रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रशासनाने असोदा गेट व भादली गेट दोन दिवस दिवस बंद ठेवले आहे. परिणामी यामुळे शुक्र‌वारी सकाळी असोदा गेट बंद झाल्यावर वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. त्यामुळे या मार्गावरील हजारो वाहनधारकांना प्रजापत नगरातून ममुराबाद पुलामार्गे शनिपेठकडे गावात यावे लागले. विशेष म्हणजे पावसामुळे हा रस्ता अतिशय चिखलमय झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. तसेच दोन वर्षांपासून या रेल्वे मार्गाकडील पर्यायी रस्त्याची अद्याप दुरूस्ती न करण्यात आल्यामुळे, नागरिकांमधुन मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे गेट बंद असल्यामुळे प्रवासी वाहनधारक व रिक्षा चालकांनी गेटवरच प्रवाशांना सोडले व पुन्हा हे प्र‌वासी गेटच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनांमधुन गावकडे परतले.