शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

चौबे मार्केट ते बेंडाळे चौकापर्यंत ३५ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST

जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या चौबे मार्केट ते बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या ...

जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या चौबे मार्केट ते बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने लहान-मोठे ३५ हून अधिक खड्डे आहे. त्यात मुख्य म्हणजे मुख्य भाजी मंडईतील सुभाष चौक ते चौबे मार्केटपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या ठिकाणाहून वाहन काढताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. अमृतचे आणि त्यानंतर भुयारी गटारींच्या खोदकामामुळे या रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली आहे.

चौबे मार्केटच्या सुरुवातीपासूनच रस्त्याची दुरवस्था

चौबे मार्केटकडून सुभाष चौकाकडे येताना या रस्त्याच्या सुरुवातीला खड्डे दिसून येतात. रस्त्याच्या मधोमध करण्यात आलेल्या खोदकामामुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खोदकामानंतर हा रस्ता व्यवस्थित दुरुस्ती न करता, तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. परिणामी यामुळे संपूर्ण रस्ता खालीवर झाला आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांच्या जागी मुरूम न टाकता, काही ठिकाणी माती टाकल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे वाहतूक संथ गतीने होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी दगड-गोटे वर आल्यामुळे वाहनधारकांची अधिकच गैरसोय होत आहे.

खड्ड्यांसह अतिक्रमणाचाही त्रास

चौबे मार्केट ते बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खड्ड्यांची ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, या ठिकाणी लहान व मोठे मिळून ३५ खड्डे दिसून आले. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्याही उखडलेल्या दिसून आल्या. यामुळे वाहनधारकांची कसरत होत असताना, दुसरीकडे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारच्या विक्रेत्यांनी हातगाड्या उभ्या करून अतिक्रमण केल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन काढण्यासही जागा राहत नसून, किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन, रस्त्यांच्या दुरुस्तीसह अतिक्रमणही हटविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.