शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

अजिंठा घाटात अपघातामुळे जळगाव जिल्ह्यातील 33 एसटी बसेस् अडकल्या

By admin | Updated: May 6, 2017 17:00 IST

या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या.

ऑनलाइन लोकमत

जळगाव : अजिंठा घाटात दोन ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन जळगावकडे येणा:या व जळगावसह इतर आगारांमधून औरंगाबाद, पुणेकडे जाणा:या 33 एसटी बस अडकल्या. या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या. यामुळे जिल्हा प्रशासनाचे आदेश घेऊन जिल्ह्यातील एसटीच्या आगारांमधून सुटणा:या 25 एसटी बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून वळविण्यात आल्या. त्यात जवळपास 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागले. एक कि.मी.मागे एक रुपया अधिक अशा स्वरुपात भाडे आकारण्यात आले. फर्दापूर येथे स्वतंत्र कक्षाद्वारे त्यासंबंधीच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या. पहाटे अजिंठा घाटात अपघात घडल्यानंतर त्याची माहिती लागलीच एसटीच्या विभागीय कार्यालयास न मिळाल्याने काही बस फर्दापूरमार्गे पुढे घाटाकडे गेल्या. त्या जशा पुढे गेल्या तशा मागे येणे शक्य नव्हते. त्यामुळे यावल आगारातील सहा, जळगाव आगारातील सहा, जामनेर आगारातील सहा, मुक्ताईनगर आगारातील एक व भुसावळ आगारातील सहा एसटी बस अडकल्या. या बसमागेही मोठी वाहतूक कोंडी झाली. पर्यवेक्षकांना फर्दापूरकडे तातडीने पाठविलेअजिंठा घाटात वाहतुकीची कोंडी झाल्याने सकाळी 7 वाजताच एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाने एका विशेष वाहनाद्वारे पर्यवेक्षक व अधिका:यांना पाठविले. ज्या बस रस्त्यात जाताना दिसल्या त्यांना घाटनांद्रा घाटातून जाण्याच्या सूचना दिल्या. जवळपास 25 बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून पाठविण्यात आल्या. यातील 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागल्याची माहिती मिळाली. सकाळी सहा व सातदरम्यान निघालेल्या 20 बस अडकल्यासकाळी सहा व सात यादरम्यान औरंगाबाद व पुणेकडे यावल, जळगाव, जामनेर, भुसावळ या आगारांमधून निघालेल्या 20 एसटी बस अजिंठा घाटातील कोंडीत अडकल्या. त्यांच्यामागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यातील प्रवाशांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था लागलीच करणे शक्य झाले नाही. अशा जवळपास 700 प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. येणा:या 13 बस अडकल्याजळगावकडे औरंगाबाद, पुणे, बुलडाणा, सिल्लोड, अकोला आदी ठाकाणाहून येणा:या जवळपास 13 बस घाटात अडकल्या. त्या बसचा मार्ग लागलीच बदलणे शक्य झाले नाही. या बसमध्येही जवळपास 500 प्रवासी होते.  सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहितीएसटीच्या विभागीय कार्यालयास सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली. पण 11 वाजेनंतर वाहतुकीची कोंडी दूर झाली.