शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

डिप्लोमा प्रवेशासाठी ३ हजार ३८४ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सातत्याने ...

जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. आता विद्यार्थ्यांना २७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. दुसरीकडे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ३ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी २ हजार २७३ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया समन्वयक पी. पी. गडे यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात अभियांत्रिकीची १३ तर फार्मसीची १२ अशी एकूण २५ डिप्लोमा महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ‘ई-स्क्रूटिनी’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. दरम्यान, विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत अर्जांची मुदत देण्यात आली होती. नंतर ती वाढवून २० ऑगस्ट करण्यात आली होती. आता पुन्हा त्यात वाढ देण्यात आली असून, २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

१,१११ विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपूर्ण

जळगाव जिल्ह्यातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या एकूण तीन हजार जागांसाठी आतापर्यंत ३ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहेत. त्यातील २ हजार २७३ विद्यार्थ्यांनी अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. मात्र, १ हजार १११ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात त्रुटी व कागदपत्रे अपूर्ण आढळून आली आहेत.

४ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी होणार जाहीर

डिप्लोमा प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी ही ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. नंतर यादीसंदर्भात काही तक्रार असल्यास ती ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सादर करता येतील. शेवटी ४ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.