शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

शिक्षकांच्या चुकीच्या नियुक्तया नगराध्यक्षांना ३ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:11 IST

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश : १९९७ मध्ये केला होता ठराव

जळगाव : १९९७ मध्ये तत्कालीन नगरपालिकेत तीन शिक्षकांची नियुक्ती केल्याचा ठरावाला औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले असून, या शिक्षकांच्या वेतनावर करण्यात आलेला खर्च तत्कालीन स्थायी सभापती व नगराध्यक्षांकडून वसुल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.खंडपीठाने या प्रकरणी जानेवारी महिन्यातच आदेश दिले असून, या निकालाची प्रत नुकतीच मनपाला प्राप्त झाली आहे. स्थायी समितीने तीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव केला होता. तत्कालीन स्थायी समिती सभापती हेच तेव्हा नगराध्यक्ष होते. त्यानंतर २००९ मध्ये महापालिकेने हा ठराव विखंडीत केल्यामुळे तीन्ही शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मनपाच्या या निर्णया विरोधात २०१० मध्ये सुनील नारखेडे, रजनी येवले व वंदना चौधरी या शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देत तत्कालीन स्थायी समितीने केलेला ठराव चुकीचा असल्याचे सांगत हा ठराव रद्द केला होता.शिक्षकांच्या वेतनावर झालेला खर्च हा ठराव करणाऱ्या स्थायी समिती सभापती म्हणजेच तत्कालीन नगरध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून वसुल करण्याचे आदेश आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.तिन्ही शिक्षकांना प्रत्येकी १ लाख रु पये द्यावेनियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांनी काही काळ सेवा बजावल्यामुळे तीन्ही शिक्षकांना प्रत्येकी १ लाख म्हणजेच एकूण ३ लाख रुपयांची रक्कम ही तत्कालीन स्थायी समितीकडून वसुल करण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. ही रक्कम तीन महिन्यांचा आत द्यावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने आपल्या तिजोरीतून ही रक्कम शिक्षकांना देण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानंतर ही रक्कम तत्कालीन स्थायी समिती सभापतीकडून वसुल करावी, तसेच ही रक्कम देण्यास सभापतीने नकार दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा माध्यमातून ही वसुली करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण