शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

शिक्षकांच्या चुकीच्या नियुक्तया नगराध्यक्षांना ३ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:11 IST

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश : १९९७ मध्ये केला होता ठराव

जळगाव : १९९७ मध्ये तत्कालीन नगरपालिकेत तीन शिक्षकांची नियुक्ती केल्याचा ठरावाला औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले असून, या शिक्षकांच्या वेतनावर करण्यात आलेला खर्च तत्कालीन स्थायी सभापती व नगराध्यक्षांकडून वसुल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.खंडपीठाने या प्रकरणी जानेवारी महिन्यातच आदेश दिले असून, या निकालाची प्रत नुकतीच मनपाला प्राप्त झाली आहे. स्थायी समितीने तीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव केला होता. तत्कालीन स्थायी समिती सभापती हेच तेव्हा नगराध्यक्ष होते. त्यानंतर २००९ मध्ये महापालिकेने हा ठराव विखंडीत केल्यामुळे तीन्ही शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मनपाच्या या निर्णया विरोधात २०१० मध्ये सुनील नारखेडे, रजनी येवले व वंदना चौधरी या शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देत तत्कालीन स्थायी समितीने केलेला ठराव चुकीचा असल्याचे सांगत हा ठराव रद्द केला होता.शिक्षकांच्या वेतनावर झालेला खर्च हा ठराव करणाऱ्या स्थायी समिती सभापती म्हणजेच तत्कालीन नगरध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून वसुल करण्याचे आदेश आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.तिन्ही शिक्षकांना प्रत्येकी १ लाख रु पये द्यावेनियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांनी काही काळ सेवा बजावल्यामुळे तीन्ही शिक्षकांना प्रत्येकी १ लाख म्हणजेच एकूण ३ लाख रुपयांची रक्कम ही तत्कालीन स्थायी समितीकडून वसुल करण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. ही रक्कम तीन महिन्यांचा आत द्यावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने आपल्या तिजोरीतून ही रक्कम शिक्षकांना देण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानंतर ही रक्कम तत्कालीन स्थायी समिती सभापतीकडून वसुल करावी, तसेच ही रक्कम देण्यास सभापतीने नकार दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा माध्यमातून ही वसुली करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण