शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात २२९ रोहित्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

इन्फो : तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा : काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ...

इन्फो :

तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा :

काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तक्रार करण्यात येते. तक्रारीनंतर महावितरणचे कर्मचारी रोहित्राची पाहणी करून जातात. मात्र, नवीन रोहित्र नेमके कधी बसविण्यात येईल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे तक्रार करूनही नवीन रोहित्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

--

सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात २२९ रोहित्र बंद

::

इन्फो :

पर्यायी विजेची व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान :

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. वीजपुरवठा नसल्यामुळे १० ते १५ दिवस पिके पाण्यावाचून राहतात. परिणामी पिके कोमेजून उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतर्फे वर्तविण्यात येत आहे.

इन्फो :

सर्वच पिकांना बसतोय फटका :

रोहित्र जळाल्यावर जोपर्यंत नवीन रोहित्र बसविले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी लागवड केेलेल्या सर्वच पिकांना फटका बसतो. यामध्ये विशेषत: मका, ऊस, हरभरा या पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

इन्फो :

शेतकऱ्यांनी रोहित्राबाबत तक्रार केल्यावर महावितरणतर्फे चौकशी करून, लागलीच नवीन रोहित्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. काही दिवसांतच नवीन रोहित्र बसविण्यात येते. तसेच महावितरणकडे रोहित्रासाठी ऑइलचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे.

फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.

::

इन्फो :

रोहित्र जळाल्यावर महावितरणकडे तक्रार केल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी नवीन रोहित्र बसविले जात नाही. त्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. परिणामी वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे पिकांवर परिणाम होऊन, उत्पादनातही घट होते.

संजय ढाके, शेतकरी