शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पाच्या कामाला १३ महिन्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४९ कोटी ६७ लाख रुपयांच्या नवीन डीपीआरला राज्य शासनाच्या नगरविकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४९ कोटी ६७ लाख रुपयांच्या नवीन डीपीआरला राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने शुक्रवारी मंजुरी दिली. या प्रकल्पाला २०१८मध्येच मंजुरी मिळाली होती. मात्र, मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे व मागील डीपीआर हा इतर महापालिकेच्या कॉपी-पेस्ट केल्याच्या मुद्द्यावरून निरी या संस्थेने जुना डीपीआर नामंजूर केला होता. त्यानंतर नव्याने डीपीआर तयार करून याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला होता. अखेर या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

एप्रिल २०१८मध्ये मनपाच्या तीस कोटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाच्या डी. पी. आर.ला मंजुरी मिळाली होती. यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून औरंगाबाद येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंपनीला घनकचरा प्रकल्प तयार करण्यासाठी ठेकादेखील दिला होता. मात्र, महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. तसेच डीपीआर तयार करताना मालेगाव व इतर शहरांच्या डीपीआरची कॉपी-पेस्ट केल्याचा ठपका ‘निरी’ने ठेवला होता. तसेच महापालिकेचा जुना डीपीआर नामंजूर करून नव्याने तयार करण्याच्या सूचना ‘निरी’ने दिल्यानंतर मनपाने नवीन डीपीआर तयार केला होता. २०१८च्या डीपीआरच्या तुलनेत नवीन डीपीआरमध्ये १९ कोटींची तरतूद जास्त करण्यात आली आहे.

आठ वर्षांपासून बंद पडला आहे प्रकल्प

१. मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे.

२. बंद पडलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी दररोज २७० टनपेक्षा अधिक कचरा जमा होतो.

३. याठिकाणी अजूनही एक लाख मेट्रिक टन कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया झालेली नाही.

४. अनेक वर्षांपासून पडलेल्या या कचऱ्याला रासायनिक प्रक्रियेमुळे आगी लागतात व लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरतो.

५. कचरा प्रकल्पाच्या ठिकाणावर निघणाऱ्या विषारी धुरामुळे तब्बल २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

६. घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया होऊन खत तयार करता येऊ शकते. तसेच परिसरात पसरणारा धूरदेखील कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

प्रकल्पासाठी १३ महिन्यांची मुदत

नवीन डीपीआर मंजूर झाल्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊ शकते. मनपा प्रशासनाने याआधीच निविदा प्रक्रिया राबवून औरंगाबाद येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला हे काम दिले आहे. काही तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली. तसेच प्रकल्पाच्या कामासाठी १३ महिन्यांची मुदत असून, हे काम जून २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, या डीपीआरमधील वाढीव खर्चाची तरतूद १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्याचे आदेश शासन निर्णयात देण्यात आले आहेत.