शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावानुसार १०८ कोटी ७७ लाखांच्या नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

रावेर : केळीच्या बाजारभावाने मुसंडी मारली असतानाच वादळी पावसाच्या तांडवाने रुद्रावतार धारण केल्याने आज १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल ...

रावेर : केळीच्या बाजारभावाने मुसंडी मारली असतानाच वादळी पावसाच्या तांडवाने रुद्रावतार धारण केल्याने आज १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने कापली जाणारी परिपक्व केळी जमीनदोस्त झालेली केळी ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात पडीच्या दरात कापली गेली. अपरिपक्व मालाच्या केळीबागा मात्र मातीमोल झाल्या. उन्मळून पडलेली केळीबागेतील खोडं बांधावर वा शेताबाहेर फेकण्यासाठी शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आजच्या १ हजार ४५० रू. प्रतिक्विंटलचा चालू बाजारभाव व ६०० रु. प्रतिक्विंटल उत्पादन खर्च गृहीत धरला असता प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार ७५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यास किमान १०८ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रावेर तालुक्यातील तापीकाठच्या खिर्डी खुर्द, खिर्डी बु, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, धामोडी, सुलवाडी, भामलवाडी, कोळदा, ऐनपूर, कांडवेल, विटवे, निंबोल, व निंभोरासीम शिवारातील ७५७ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा जमीनदोस्त होऊन ३० कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

तथापि, आजच्या १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भावानुसार दरनिश्चिती झालेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्याने, त्याच केळीबागेतील सरसकट परिपक्व केळीमाल ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात आज कापला गेल्याचे बळीराजाचे दुर्दैव आहे.

एकंदरीत, तालुका प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा बाधित झाल्याचे गृहीत धरल्यास किमान हेक्टरी ७० टन उत्पादनक्षमता व १०० रुपये प्रतिखोड उत्पादन खर्च पाहता आजच्या १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे ५३ हजार ६०० क्विंटल केळीमालाची १०८ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे. किंबहुना बाधित क्षेत्र वृद्धिंगत झाल्यास त्यापेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

३४ हजार खोडांची केळीबाग ऐन कापणीवर होती. त्यापैकी फक्त १६ हजार केळी खोडे कापली गेली असून उर्वरित केळीमाल मातीमोल झाला आहे.

-मुरलीधर चौधरी, केळी उत्पादक शेतकरी, वाघाडी, ता. रावेर