शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

बाजारभावानुसार १०८ कोटी ७७ लाखांच्या नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

रावेर : केळीच्या बाजारभावाने मुसंडी मारली असतानाच वादळी पावसाच्या तांडवाने रुद्रावतार धारण केल्याने आज १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल ...

रावेर : केळीच्या बाजारभावाने मुसंडी मारली असतानाच वादळी पावसाच्या तांडवाने रुद्रावतार धारण केल्याने आज १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने कापली जाणारी परिपक्व केळी जमीनदोस्त झालेली केळी ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात पडीच्या दरात कापली गेली. अपरिपक्व मालाच्या केळीबागा मात्र मातीमोल झाल्या. उन्मळून पडलेली केळीबागेतील खोडं बांधावर वा शेताबाहेर फेकण्यासाठी शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आजच्या १ हजार ४५० रू. प्रतिक्विंटलचा चालू बाजारभाव व ६०० रु. प्रतिक्विंटल उत्पादन खर्च गृहीत धरला असता प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार ७५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यास किमान १०८ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रावेर तालुक्यातील तापीकाठच्या खिर्डी खुर्द, खिर्डी बु, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, धामोडी, सुलवाडी, भामलवाडी, कोळदा, ऐनपूर, कांडवेल, विटवे, निंबोल, व निंभोरासीम शिवारातील ७५७ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा जमीनदोस्त होऊन ३० कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

तथापि, आजच्या १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भावानुसार दरनिश्चिती झालेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्याने, त्याच केळीबागेतील सरसकट परिपक्व केळीमाल ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात आज कापला गेल्याचे बळीराजाचे दुर्दैव आहे.

एकंदरीत, तालुका प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा बाधित झाल्याचे गृहीत धरल्यास किमान हेक्टरी ७० टन उत्पादनक्षमता व १०० रुपये प्रतिखोड उत्पादन खर्च पाहता आजच्या १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे ५३ हजार ६०० क्विंटल केळीमालाची १०८ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे. किंबहुना बाधित क्षेत्र वृद्धिंगत झाल्यास त्यापेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

३४ हजार खोडांची केळीबाग ऐन कापणीवर होती. त्यापैकी फक्त १६ हजार केळी खोडे कापली गेली असून उर्वरित केळीमाल मातीमोल झाला आहे.

-मुरलीधर चौधरी, केळी उत्पादक शेतकरी, वाघाडी, ता. रावेर