शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वन्यजीवांच्या पाण्यासाठी १०० पाणवठे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

पाऊस चांगला झाल्याने नैसर्गिक पाणवठ्यांवर मुबलक पाणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- जिल्ह्यातील चोपडा, यावल, चारठाणा, वडोदा, पाल ज्या वनक्षेत्रात ...

पाऊस चांगला झाल्याने नैसर्गिक पाणवठ्यांवर मुबलक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- जिल्ह्यातील चोपडा, यावल, चारठाणा, वडोदा, पाल ज्या वनक्षेत्रात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव हे मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. त्यामुळे वन्यजीव विरुद्ध मानव असा संघर्ष निर्माण होत असतो. पाण्याच्या शोधात वन्य जीव मानवी वस्तीत येऊ नये म्हणून वनविभागाकडून चार वर्षांपूर्वी १०० हून अधिक पाणवठे तयार केले आहेत. दर वर्षी उन्हाळ्यात या पाणवठ्यांवर वन विभागाकडून पाण्याची व्यवस्था केली जात असते. दरम्यान, या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने, नैसर्गिक पाणवठ्यांवर देखील मुबलक पाण्याचा साठा आहे. यामुळे या वर्षी वन्यजीवांचा पाण्याची समस्या भासणार नाही असा दावा वनविभागाकडून केला जात आहे. मात्र, वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्या वर पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमीकडून केली जात आहे