शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या मागण्यांसाठी युवकांसह युवती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासह इतर अनेक मागण्या मोर्चात सहभागी युवक, ...

जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासह इतर अनेक मागण्या मोर्चात सहभागी युवक, युवतींनी केल्या. ओबीसींच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

ओबीसी समाजाच्या अनेक न्याय्य मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे.

तेजेस कुलवंत

नेर

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. शिवाय ओबीसी प्रवर्गातील नागरिक, युवकांसाठी अधिकाधिक कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या समाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शासनाने मदतीचे धोरण राबविणे गरजेचे आहे.

डॉ. प्रदीप पंडित

जालना

आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आम्ही गत अनेक वर्षांपासून लढा देत आहोत. मात्र, शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा होता. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलने उभी केली जातील.

गणेश जायभाये

निमगाव, ता. देऊळगावराजा

ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अपेक्षितरित्या प्रगत नाही. त्यामुळे शासनाने ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. समाजासाठी विशेषत: युवकांसाठी कल्याणकारी योजना राबिवण्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रघुनाथ खैरे

बदनापूर

ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. विशेषत: जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. ओबीसींमधील महिला, मुलींसाठीही विविध कल्याणकारी योजना राबिवणे गरजेचे आहे, जणेेकरून महिला, मुली सक्षम होण्यास मदत होईल.

वैष्णवी बांगर

नालेवाडी, अंबड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५२मध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. केंद्र शासनाने ओबीसींची जनगणना करून त्यांच्या हक्काचे संवैधानिक आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी हा मोर्चा असून, मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे.

डॉ. प्रल्हाद लुलेकर

औरंगाबाद