शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या मागण्यांसाठी युवकांसह युवती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासह इतर अनेक मागण्या मोर्चात सहभागी युवक, ...

जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासह इतर अनेक मागण्या मोर्चात सहभागी युवक, युवतींनी केल्या. ओबीसींच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

ओबीसी समाजाच्या अनेक न्याय्य मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे.

तेजेस कुलवंत

नेर

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. शिवाय ओबीसी प्रवर्गातील नागरिक, युवकांसाठी अधिकाधिक कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या समाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शासनाने मदतीचे धोरण राबविणे गरजेचे आहे.

डॉ. प्रदीप पंडित

जालना

आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आम्ही गत अनेक वर्षांपासून लढा देत आहोत. मात्र, शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा होता. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलने उभी केली जातील.

गणेश जायभाये

निमगाव, ता. देऊळगावराजा

ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अपेक्षितरित्या प्रगत नाही. त्यामुळे शासनाने ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. समाजासाठी विशेषत: युवकांसाठी कल्याणकारी योजना राबिवण्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रघुनाथ खैरे

बदनापूर

ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. विशेषत: जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. ओबीसींमधील महिला, मुलींसाठीही विविध कल्याणकारी योजना राबिवणे गरजेचे आहे, जणेेकरून महिला, मुली सक्षम होण्यास मदत होईल.

वैष्णवी बांगर

नालेवाडी, अंबड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५२मध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. केंद्र शासनाने ओबीसींची जनगणना करून त्यांच्या हक्काचे संवैधानिक आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी हा मोर्चा असून, मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे.

डॉ. प्रल्हाद लुलेकर

औरंगाबाद