शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

जिल्ह्यातील त्या २० ग्रामपंचायती पुन्हा बिनविरोध की रंगणार राजकारणाचा फड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

मार्चपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच राज्यातील ...

मार्चपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला.

त्यातच शासकीय सेवा बजावलेल्या व्यक्तीला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश शासनाने दिल्याने अनेकजण हैराण झाले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केले असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणूक आयोगाने देखील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.

जालना जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या गतपंचवार्षिकला बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. यंदा मात्र, महाविकास आघाडीमुळे या निवडणुका बिनविरोध होण्याचे चित्र दिसून येत नाही. कारण भाजप स्वबळावर ग्रामपंचायत निवडणुका लढणार आहे. त्यामुळे या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होत्या की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . गतपंचवार्षिकला मंठा ५ तर भोकरदन तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती.

बिनविरोधची परंपरा असलेले जवखेडा खुर्द, मनापूर गाव

भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द, मनापूर येथे मागील ३० वर्षांपासून बिनविरोध निवडणूक होत आहे. जवखेडा खुर्द हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे गाव आहे. तर मनापूर हे पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण दळवी यांचे गाव आहे. या दोघांनीही गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली आहे.