शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

केदारखेडा येथील पाणीपुरवठा सहा दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातील पाणीपुवठा गत सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी याची दखल घेत ...

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातील पाणीपुवठा गत सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी याची दखल घेत तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील दोन दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

केदारखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीपात्रातील सार्वजनिक विहिरीचे पाणी संपुष्टात आल्याने सहा दिवसांपासून गावातील नळांना येणारे पाणी बंद झाले आहे. त्यातच गाव कारभारी नवनियुक्त असून, हाती कारभार घेतला नसल्याने कोणाकडे ग्राहणे मांडावे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता; परंतु नवनिर्वाचित सदस्यांना पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर संदीप शेळके व नवनिर्वाचित सदस्यांनी पाणीपुरवठा कशामुळे बंद आहे? याची माहिती ग्रामसेविका के. एल. रोकडे व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. नदीपात्रातील विहिरीचे पाणी संपले असल्याचे कळाल्यानंतर तात्काळ बानेगाव धरणातील जिल्हा परिषदच्या निधीतून झालेल्या पाइपलाइनची पाहणी करण्यात आली. या पाइपलाइनला असलेली अडचण तात्काळ निकाली काढून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. शिवाय दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी संदीप शेळके, ग्रामपंचायत सदस्य पंडित जाधव, ज्ञानेश्वर जाधव, रतन जाधव, बालू जाधव, बालासाहेब करतारे, ग्रामपंचायतचे लिपिक बालू जाधव, पाणीपुरवठा कर्मचारी किसन हगाम, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती.