शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

केदारखेडा येथील पाणीपुरवठा सहा दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातील पाणीपुवठा गत सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी याची दखल घेत ...

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातील पाणीपुवठा गत सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी याची दखल घेत तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील दोन दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

केदारखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीपात्रातील सार्वजनिक विहिरीचे पाणी संपुष्टात आल्याने सहा दिवसांपासून गावातील नळांना येणारे पाणी बंद झाले आहे. त्यातच गाव कारभारी नवनियुक्त असून, हाती कारभार घेतला नसल्याने कोणाकडे ग्राहणे मांडावे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता; परंतु नवनिर्वाचित सदस्यांना पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर संदीप शेळके व नवनिर्वाचित सदस्यांनी पाणीपुरवठा कशामुळे बंद आहे? याची माहिती ग्रामसेविका के. एल. रोकडे व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. नदीपात्रातील विहिरीचे पाणी संपले असल्याचे कळाल्यानंतर तात्काळ बानेगाव धरणातील जिल्हा परिषदच्या निधीतून झालेल्या पाइपलाइनची पाहणी करण्यात आली. या पाइपलाइनला असलेली अडचण तात्काळ निकाली काढून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. शिवाय दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी संदीप शेळके, ग्रामपंचायत सदस्य पंडित जाधव, ज्ञानेश्वर जाधव, रतन जाधव, बालू जाधव, बालासाहेब करतारे, ग्रामपंचायतचे लिपिक बालू जाधव, पाणीपुरवठा कर्मचारी किसन हगाम, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती.