शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

२५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब वाहत ...

मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब वाहत आहे. या पावसाचा पिकांना फायदा झाला आहे.

दानापूर येथील जुई धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. जर हा पाऊस झाला नसता तर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले असते. ३१ ऑगस्टपर्यंत धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. ३१ ऑगस्टच्या रात्री आणवा, वाकडी, जानेफळ गायकवाड, कोदा, कठोरा बाजार, सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, उंडनगाव आदी भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जुई नदीला गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच मोठा पूर आला. परिणामी, एकाच रात्रीत धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणात आता ३० टक्के पाणीसाठा झाला असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.जी. राठोड यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पूर्णा, केळना, रायघोळ, गिरजा, धामना या नद्यांना पूर आल्यामुळे खडकपूर्णा धरणातील पाणीसाठ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जुई धरणाची पाणीपातळी एकदम कमी झाली होती; मात्र रात्रीच्या पावसाने धरणात समाधानकारक पाणीसाठा आला आहे. तरी पाणीपुरवठा योजना असलेल्या गावांनी पाण्याचा काटकसरीने उपसा करावा. धामणा धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा आहे.

एस.जी. राठोड, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग.