शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापन काळाची गरज - डॉ. तावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

जालना : कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असून, त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनली ...

जालना : कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असून, त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर तावरे यांनी येथे आयोजित कार्यशाळेत केले.

ग्रीन आर्मी आणि सृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अंकुशराव टोपे महाविद्यालयात ‘कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित पर्यावरण कार्यशाळेत डॉ. तावरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, उपप्राचार्य रमेश भुतेकर, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. प्रभाकर तावरे यांनी कचरा वर्गीकरण, त्याची आवश्यकता, उपयोजन याविषयी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येकाने पर्यावरण संतुलनासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून त्यांनी वाढत्या प्रदूषणाचे परिणाम विषद केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी शंका समाधानही केले.

डॉ. जवाहर काबरा यांनी ग्रीन आर्मीची भूमिका विषद करून युवा पिढी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असल्याचे आणि ग्रीन आर्मीबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी मार्गदर्शनपर भाषणात पर्यावरण प्रश्नांचा ऊहापोह केला.

प्रास्ताविकपर भाषणात ग्रीन आर्मीच्या डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी या पर्यावरण कार्यशाळेचा उद्देश विषद केला. त्या म्हणाल्या की, आजच्या ज्वलंत पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी सृष्टी फाउंडेशनने पर्यावरणासाठी ग्रीन आर्मी या युवकांच्या चळवळीची निर्मिती केली. यामध्ये जेईएस महाविद्यालय, अंकुशराव टोपे महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील युवक सहभागी आहेत. अनेक नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम ग्रीन आर्मीच्या माध्यमातून राबवले जात असल्याचे श्रीपत यांनी स्पष्ट केले.

यावेळी यूथ ग्रीन आर्मीच्या समन्वयक डॉ. सुजाता देवरे, डॉ. स्वाती सुरेश पुरी, प्रा. पोपळघट, दिगंबर दाते, भुसे, संध्या जहागीरदार, प्रा. तारा काबरा, जयश्री कुंजके, संजीवनी देशपांडे, संगीता मुळे, राजश्री मुर्गे यावेळी ग्रीन आर्मीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.