शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

कचरा व्यवस्थापन काळाची गरज - डॉ. तावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

जालना : कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असून, त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनली ...

जालना : कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असून, त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर तावरे यांनी येथे आयोजित कार्यशाळेत केले.

ग्रीन आर्मी आणि सृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अंकुशराव टोपे महाविद्यालयात ‘कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित पर्यावरण कार्यशाळेत डॉ. तावरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, उपप्राचार्य रमेश भुतेकर, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. प्रभाकर तावरे यांनी कचरा वर्गीकरण, त्याची आवश्यकता, उपयोजन याविषयी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येकाने पर्यावरण संतुलनासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून त्यांनी वाढत्या प्रदूषणाचे परिणाम विषद केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी शंका समाधानही केले.

डॉ. जवाहर काबरा यांनी ग्रीन आर्मीची भूमिका विषद करून युवा पिढी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असल्याचे आणि ग्रीन आर्मीबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी मार्गदर्शनपर भाषणात पर्यावरण प्रश्नांचा ऊहापोह केला.

प्रास्ताविकपर भाषणात ग्रीन आर्मीच्या डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी या पर्यावरण कार्यशाळेचा उद्देश विषद केला. त्या म्हणाल्या की, आजच्या ज्वलंत पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी सृष्टी फाउंडेशनने पर्यावरणासाठी ग्रीन आर्मी या युवकांच्या चळवळीची निर्मिती केली. यामध्ये जेईएस महाविद्यालय, अंकुशराव टोपे महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील युवक सहभागी आहेत. अनेक नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम ग्रीन आर्मीच्या माध्यमातून राबवले जात असल्याचे श्रीपत यांनी स्पष्ट केले.

यावेळी यूथ ग्रीन आर्मीच्या समन्वयक डॉ. सुजाता देवरे, डॉ. स्वाती सुरेश पुरी, प्रा. पोपळघट, दिगंबर दाते, भुसे, संध्या जहागीरदार, प्रा. तारा काबरा, जयश्री कुंजके, संजीवनी देशपांडे, संगीता मुळे, राजश्री मुर्गे यावेळी ग्रीन आर्मीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.