शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विविध हंगामातील पिकांसाठी वरदचे ॲग्रो टेक्नॉलॉजी किट ठरणार शेतकऱ्यांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

जालना : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. ...

जालना : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. परंतु सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, औषधी दुकानात जाऊन खरेदी करणे अडचणीचे ठरत आहे. ही अडचण लक्षात घेत विविध पिकांसाठी लागणारे विविध घटक आणि औषधांसाठी शेतकऱ्यांची होणारी अडचण आणि धावपळ रोखण्यासाठी जालन्यातील वरद फर्टिलायझर्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी अशी ॲग्रो टेक्नॉलॉजी वरद किट तयार केली आहे. या किटमध्ये सर्व हंगामातील विविध पिकांसाठी लागणाऱ्या औषधे, खतांचा समावेश करण्यात आला आहे.

अत्यंत कमी खर्चात आणि पिकांसाठी आवश्‍यक असणारे घटक हे एकाच किटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी वरद फर्टिलायझर्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ॲग्रो टेक्नॉलॉजी किट तयार केली आहे. वरद किट मुख्यतः सोयाबीन, तूर, कापूस, मूग, तीळ, उडीद आदी पिकांकरिता बनवलेली आहे. विविध पिकांच्या नियोजनाकरिता लागणाऱ्या घटकांचा या किटमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही किट शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने बुक करण्याची सोयदेखील कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

या वरद किटचे उद्घाटन नुकतेच शेतीतज्ज्ञ डॉ. दिलीप उदासी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते लिखित कृषी तंत्रज्ञानविषयक समृद्ध बळीराजा पुस्तकाचे विमोचन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रमास वरद फर्टिलायझर्स जालना येथे पार पडला. यावेळी वरद ग्रुप व महाराष्ट्र स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानधानी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्रातील जवळपास २९ हजार शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी समृद्ध बळीराजा पुस्तक (उदासी तंत्र) यातील नियोजनाचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा व उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.

.............................