शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

विविध हंगामातील पिकांसाठी वरदचे ॲग्रो टेक्नॉलॉजी किट ठरणार शेतकऱ्यांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

जालना : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. ...

जालना : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. परंतु सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, औषधी दुकानात जाऊन खरेदी करणे अडचणीचे ठरत आहे. ही अडचण लक्षात घेत विविध पिकांसाठी लागणारे विविध घटक आणि औषधांसाठी शेतकऱ्यांची होणारी अडचण आणि धावपळ रोखण्यासाठी जालन्यातील वरद फर्टिलायझर्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी अशी ॲग्रो टेक्नॉलॉजी वरद किट तयार केली आहे. या किटमध्ये सर्व हंगामातील विविध पिकांसाठी लागणाऱ्या औषधे, खतांचा समावेश करण्यात आला आहे.

अत्यंत कमी खर्चात आणि पिकांसाठी आवश्‍यक असणारे घटक हे एकाच किटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी वरद फर्टिलायझर्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ॲग्रो टेक्नॉलॉजी किट तयार केली आहे. वरद किट मुख्यतः सोयाबीन, तूर, कापूस, मूग, तीळ, उडीद आदी पिकांकरिता बनवलेली आहे. विविध पिकांच्या नियोजनाकरिता लागणाऱ्या घटकांचा या किटमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही किट शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने बुक करण्याची सोयदेखील कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

या वरद किटचे उद्घाटन नुकतेच शेतीतज्ज्ञ डॉ. दिलीप उदासी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते लिखित कृषी तंत्रज्ञानविषयक समृद्ध बळीराजा पुस्तकाचे विमोचन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रमास वरद फर्टिलायझर्स जालना येथे पार पडला. यावेळी वरद ग्रुप व महाराष्ट्र स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानधानी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्रातील जवळपास २९ हजार शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी समृद्ध बळीराजा पुस्तक (उदासी तंत्र) यातील नियोजनाचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा व उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.

.............................