शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:04 IST

वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यातच वाढलेली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमुळे आहेत, ते रस्ते अपुरे पडत आहेत. वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.शहर वाहतूक शाखेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी वर्षभर रस्त्यावर उतरून जालन्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जागोजागी पार्किंगची व्यवस्था नसल्याने नवीन जालना तसेच जुना जालना भागातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.वाहतुकीची कोंडी सुटावी, यासाठी एकेरी मार्ग वापरण्यासाठीचे प्रयत्न झाले. परंतु पाणीवेस परिसरातून राजमहल चित्रपटगृहाकडून जाणाऱ्या वळण रस्त्याची दयनीय अवस्था आजही कायम आहे.या भागातून चारचाकी आणि दुचाकी चालविणे अवघड होऊन जाते.जागोजागी असलेले खड्डे आणि अरूंद रस्ता यामुळे हा मार्ग वाहनधारक वापरण्यास टाळतात.जालना शहरात १९८८ नंतर मास्टर प्लॅन झालेले नाही.कादराबाद, नेहरू रोड इ. भागातील मास्टर प्लॅन करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु ज्यांची घरे या मास्टर प्लॅनमध्ये जाणार आहेत. त्यांना बाजार भावाप्रमाणे मावेजा देण्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत.याची तरतूद आगामी काळात केल्यासच हे शक्य होणार आहे.आज जे रस्ते आहेत, त्यात प्रामुख्याने जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गांधी चमनहून रेल्वेस्टेशनमार्गे मोतीबाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविणे शक्य आहे.तसेच मोतीबागेकडून शनी मंदिरकडे येणारी वाहतूक ही मुक्तेश्वर वेशीपासून रेल्वेस्टेशनमार्गे गांधी चमनकडे वळविता येते. यासाठीचे लक्ष वाहतूक शाखेने घालावी, अशी मागणी होत आहे.शहरातील विविध चौकांमध्ये शहर वाहतूक शाखा आणि जालन्यातील उद्योजकांच्या सहकार्याने स्वयंचलित सिग्नल बसविण्याचे काम सुरू आहे.सोमवारी शिवाजी महाराज चौकात हे सिग्नल बसविण्यात आले. यासाठी जालना पालिकेचीही मदत होत असल्याची माहिती पो.नि. काकडे यांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक