शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

परीक्षेची आवेदनपत्रे मिळेनात

By admin | Updated: September 7, 2014 00:22 IST

जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन

जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन यांच्यासह विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यापीठ परीक्षा विभागाने परीक्षा आवेदनपत्र दाखल करण्याच्या तारखा निश्चित केल्या असतांना मुदत संपूनही विद्यार्थी परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयास मिळाले नाही, यामुळे विद्यार्थी तसेच महाविद्यालय प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती समोर आलीय.महाविद्यालय स्तरावर बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. पदवी परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप एमकेसीएलकडून महाविद्यालयांना परीक्षा आवेदन पत्रे मिळालेले नाही. परीक्षा विभाग यांच्याकडून परीक्षा आवेदन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट देण्यात आली होती. यामध्ये पुन्हा बदल करून ही मुदत ३० आॅगस्ट पर्यंत वाढविण्यात आली. मात्र अद्याप आवेदन पत्र महाविद्यालय स्तरावर प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.परीक्षेच्या तारखा संपून देखिल आवेदनपत्रे मिळत नाही. अशा परिस्थिती मध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून यांच्याकडून परीक्षा आवेदनपत्र स्वीकारायचे कधी व विद्यापीठ परीक्षा विभागाकडे सादर करायचे कधी हा प्रश्न महाविद्यालय प्रशासन यांनी देखील उपस्थित केला जात आहे.परीक्षा शुल्कापासून परीक्षा आवेदनपत्र आॅनलाईन प्रक्रियेला जोडणे यामध्ये सुध्दा वेळ जात आहे. मात्र एमकेसीएल व विद्यापीठ परीक्षा विभाग यांच्या समन्वयातून सुरु असलेल्या प्रक्रियामुळे प्रवेश प्रक्रिया असो की परीक्षा कुठलीच कामे वेळेच्या आत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्याचा त्रास देखील विद्यार्थ्यांना होत आहे.परीक्षेच्या तारखा व आवेदनपत्रे प्रक्रिया याविषयी महाविद्यालये एमकेसीएल विद्यापीठ परिक्षा विभाग यांच्याकडे महाविद्यालय स्तरावरुन विचारणा करण्यात येते; परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठ परीक्षा विभाग यांच्याकडे परीक्षेच्या तारखा निश्चित करण्याचे अधिकार असले तरी एमकेसीएल यांच्यावर नियंत्रण कोणाचे याचे उत्तर मात्र मिळत नाही. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना या अडचणी सोबत इंटरनेट सुविधा, वीज भारनियमन असे असंख्य प्रश्न आहेत. याचा विचार व्हावा, अशी देखील मागणी महाविद्यालयाकडून होत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा देता येणार नाही, असा सूर आहे. (वार्ताहर)विद्यापीठ परीक्षा विभागाने परीक्षा आवेदनपत्र दाखल करण्याच्या तारखा निश्चित केल्या असतांना मुदत संपूनही परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयास मिळाले नाही, यामुळे विद्यार्थी तसेच महाविद्यालय प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती समोर आलीय.