शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

विजय मुंडे जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बुधवारी कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचा आदेश ...

विजय मुंडे

जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बुधवारी कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचा आदेश काढला आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे दस्तुरखुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्ध्यांना ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे बाधितांची आपुलकीने सेवा करणाऱ्या ३५० जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या या लढ्यात आरोग्य विभागातील कायम अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडू लागल्याने कंत्राटी तत्त्वावर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर जिल्हावासीयांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. कोरोनाच्या या लढ्यात आरोग्य विभागातील कायम अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहोरात्र रुग्णसेवा केली. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले होते; परंतु जीव मुठीत घेऊन रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शासनाने पुन्हा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले.

गत काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे. असे असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे; परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पूर्वीप्रमाणे या वेळेसही आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचे आदेश काढले आहेत. जिल्हा प्रशासनाने अचानक आदेश काढल्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता घरी बसावे लागणार आहे. खासगी दवाखान्यात शोधूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे अशा स्थितीत जगावे कसे? हाच प्रश्न या कंत्राटी कर्मचाऱ्यांसमोर आहे.

चौकट

जिल्हाधिकारी, सीएस नॉट नॉट रिचेबल

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काढण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

कोट

न्याय मिळावा, ही अपेक्षा

मागील दीड वर्षापासून कंत्राटी अधिकारी, कर्मचारी रुग्णांची अविरत सेवा करीत आहेत. रुग्णसेवा करताना अनेकांना कोरोनाची बाधा झाली; परंतु कोरोनावर मात करीत कर्तव्य महत्त्वाचे समजून सर्वांनी रुग्णसेवा केली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे असतानाच अचानक बुधवारी सेवासमाप्तीचा आदेश काढण्यात आला आहे. मागील दीड वर्ष आम्ही रुग्णांची सेवा केली आहे. महामारीच्या काळात जेथे नातेवाईक दूर जात होते, तेथे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाधितांची सेवा केली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना असे कामावरून कमी न करता त्यांच्या सेवेची दखल घेऊन न्याय द्यावा, ही अपेक्षा.

-ॲलेक जेकब, जालना