शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

रेशन विक्रेत्यांवर नियंत्रणासाठी पथक

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

जालना : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार पथके तयार केली असून या पथकांमार्फत रेशन विक्रेत्यांवर

जालना : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार पथके तयार केली असून या पथकांमार्फत रेशन विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठकीचेही आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यात सध्या दुष्काळाची छाया आहे. अनेक गावांमध्ये आतापासूनच टंचाई जाणवू लागली आहे. डिसेंबर आणि त्यानंतर टँकर व विहिर अधिग्रहणांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आढावा बैठकांद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. २०१२ सालच्या दुष्काळाची परिस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात हाती काहीच पडत नसल्याची खंत ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त होत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी रेशन विक्रेत्यांना कडक सूचना केलेल्या आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या १५ लाख ८१ हजार २५१ एवढी आहे. त्यापैकी १२ लाख ६ हजार ८११ शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी आहेत. तर शहरी भागात ३ लाख ७७ हजार २३२ पैकी १ लाख ७१ हजार ३७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ ते २० तारखेदरम्यान गहू, तांदूळ हे अन्नधान्य दिले जाते. परंतु काही ठिकाणी विक्रेते चार-पाच दिवस दुकान सुरू ठेवतात व नंतर अन्नधान्य संपले म्हणून सांगतात आणि दुकान नेहमी बंद असते, अशा प्रकारच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे येत आहेत. या तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड यांनी रेशन विक्रेत्यांकडून दररोजची माहिती घेण्याच्या सूचना पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत प्रत्येक तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला सूचना देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)४जिल्ह्यात १२८५ रेशन विक्रेते आहेत. लाभार्थ्यांनी अन्नधान्य मिळत नसल्यास संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामीण भागात ७६ टक्के लाभार्थी आहेत. ४अन्नधान्य मिळत नसल्याने स्थलांतर करण्याची वेळ कुणावर येऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. परंतु असा प्रकार कोठे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही माचेवाड यांनी दिला आहे.