शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

रेशन विक्रेत्यांवर नियंत्रणासाठी पथक

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

जालना : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार पथके तयार केली असून या पथकांमार्फत रेशन विक्रेत्यांवर

जालना : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार पथके तयार केली असून या पथकांमार्फत रेशन विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठकीचेही आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यात सध्या दुष्काळाची छाया आहे. अनेक गावांमध्ये आतापासूनच टंचाई जाणवू लागली आहे. डिसेंबर आणि त्यानंतर टँकर व विहिर अधिग्रहणांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आढावा बैठकांद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. २०१२ सालच्या दुष्काळाची परिस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात हाती काहीच पडत नसल्याची खंत ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त होत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी रेशन विक्रेत्यांना कडक सूचना केलेल्या आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या १५ लाख ८१ हजार २५१ एवढी आहे. त्यापैकी १२ लाख ६ हजार ८११ शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी आहेत. तर शहरी भागात ३ लाख ७७ हजार २३२ पैकी १ लाख ७१ हजार ३७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ ते २० तारखेदरम्यान गहू, तांदूळ हे अन्नधान्य दिले जाते. परंतु काही ठिकाणी विक्रेते चार-पाच दिवस दुकान सुरू ठेवतात व नंतर अन्नधान्य संपले म्हणून सांगतात आणि दुकान नेहमी बंद असते, अशा प्रकारच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे येत आहेत. या तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड यांनी रेशन विक्रेत्यांकडून दररोजची माहिती घेण्याच्या सूचना पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत प्रत्येक तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला सूचना देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)४जिल्ह्यात १२८५ रेशन विक्रेते आहेत. लाभार्थ्यांनी अन्नधान्य मिळत नसल्यास संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामीण भागात ७६ टक्के लाभार्थी आहेत. ४अन्नधान्य मिळत नसल्याने स्थलांतर करण्याची वेळ कुणावर येऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. परंतु असा प्रकार कोठे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही माचेवाड यांनी दिला आहे.