शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्याने केंद्रावर खापर फोडू नये : दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

जालना : कुठल्याही बाबतीत राजकारण करणे हे भाजपचे ध्येय नाही. तुमचे मंत्री हे पोलीस दलातील अधिकाऱ्यामुळे अडचणीत आले आहेत, ...

जालना : कुठल्याही बाबतीत राजकारण करणे हे भाजपचे ध्येय नाही. तुमचे मंत्री हे पोलीस दलातील अधिकाऱ्यामुळे अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी ही न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. त्यात आमचा कुठलाच हेतू नाही. तसेच रेमडेसिविर व कोरोना प्रतिबंधक लस आणि ऑक्सिजनबाबतही जे आरोप राज्य सरकारकडून केले जात आहेत, ते निराधार असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. शनिवारी दुपारी दानवे हे जालन्यात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, राज्यात कोरोनाची साथ आटाेक्यात आणण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अधिकाधिक चाचण्यांचा वेग हा आता कुठे वाढवला आहे. तसेच गृह अलगीकरणातील संशयित रूग्णांवर लक्ष न ठेवल्याने तेच खरे स्प्रेडर निघाले. आज कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. या कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार घटला असून, एकही निर्णय स्पष्ट नसल्याने सर्वत्र संभ्रम आहे. कुठली गोष्ट ही राज्याने स्वत: करण्याऐवजी उठसूठ केंद्र सरकारवर आरोप करून स्वत:चा कमीपणा झाकण्याचा हा प्रयत्न गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री करत आहेत. परंतु, जनता सर्वकाही जाणून आहे. त्यामुळे केंद्राच्या नावाने बोटे मोडून काहीही फरक पडणार नसल्याचे दानवे म्हणाले. शनिवारी दानवे यांनी जिल्हा सरकारी रूग्णालय परिसरात निवारा केंद्राची पाहणी करून भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, सिध्दीविनायक मुळे, संजय देठे, आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावाही घेतला.

चौकट

अन्नधान्याचा मुबलक साठा देणार

कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आपण आपल्या अन्न मंत्रालयाकडून गरिबांना गहू तसेच तांदळचा मोठा साठा उपलब्ध करून दिला आहे. आगामी दोन महिने रेशनकार्डधारकांना पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ हा अतिरिक्त देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आता आमच्यावर आरोप करू शकत नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयचे छापे हा तपासाचा भाग आहे, त्यात कसले आले राजकारण, असा उलट सवाल रावसाहेब दानवेंनी केला.