शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिवसेनेने समाजसेवेला नेहमीच प्राधान्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

जालना : शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करत असतानाच समाजसेवेलाही ८० टक्के महत्त्व दिले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हा ...

जालना : शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करत असतानाच समाजसेवेलाही ८० टक्के महत्त्व दिले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हा उद्देश असून, तो आम्ही सर्व जण मिळून पुढे नेत असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

बुधवारी सामंत हे जालना दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्र. १३ मधील नवीन सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी चाेथे, बाबासाहेब इंगळे, जि.प.चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरातील विविध कामांसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. नगरसेवक विजय पवार यांनी सामंत, खोतकर यांचा सत्कार केला. या वेळी सागर चौधरी, विनोद पवार, विनोद बोडले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर नाईकवाडे यांनी केले. कार्यक्रमास ॲड. बी.एम. साळवे, शेख दादामिया, अक्तरभाई, भाऊसाहेब घुगे, मंगल मिटकर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले, डॉ. पूजा वावगे, राजेश काजळकर, महेश काजळकर, ज्योती आडेकर, अभिषेक कासारे, सिद्धार्थ वारे, कौसाबाई डोईवाड, महेश खरात, मधुकर खरात आदींची उपस्थिती होती.

लसीकरणाचे कौतुक

भाग्यनगरमधील अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू आहे. या केंद्रात ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे त्याचे कौतुक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. या केंद्रातील नियोजनाचा आदर्श राज्यपातळीवर घेतला जाईल, असेही ते म्हणाले. या वेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी तळागळापर्यंत सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचा आग्रह धरला. आपले विरोधक कुठल्याही विकासकामांवर टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता सरकार करीत असलेली कामे जनतेपर्यंत न्यावी, असेही सामंत म्हणाले. या वेळी खोतकर यांनीही मत मांडले.