शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्यातील एकाहत्तर मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ...

जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. कोरोनामुळे या शोध मोहिमेला मोठा फटका बसला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गत महिन्याच्या प्रारंभीच शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे काही दिवस ही मोहीम ठप्प होती. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाळेतील शिक्षकांनी ही शोध मोहीम जिल्हाभरात राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. शाळाबाह्य मुले राहू नयेत, सर्वांनी शिक्षण घ्यावे, लॉकडाऊन शिथिलतेनंतर शाळा सुरू झाल्या की मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी

जालना ००

अंबड २८

बदनापूर ००

भोकरदन ०१

घनसावंगी १७

जाफराबाद ०७

मंठा १८

परतूर ००

३१ मुले शाळेपासून दूरच

शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यातील ३१ मुले आजवर शाळेतच गेली नसल्याचे समोर आले आहे. यात घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ११, अंबड तालुक्यात ७, जाफराबाद तालुक्यात सात व मंठा तालुक्यात सहा मुले आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

सर्व शाळेतील शिक्षकांचा सहभाग

शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता. कोरोनातील सूचनांचे पालन करून हे सर्वेक्षण राबविण्यात आले. परंतु, या मोहिमेला यावर्षी कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. जालना व बदनापूर तालुक्यात एकही शाळाबाह्य मूल शोध मोहिमेत आढळलेले नाही.

अंबड तालुक्यात सर्वाधिक मुले

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत अंबड तालुक्यातील सर्वाधिक २१ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यात ७ मुले कधीच शाळेत न गेलेली तर २१ मुले ३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर असलेली आढळून आली आहेत. या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर नियमित शाळेत यावे, याबाबत शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

कोरोनातील सर्वच सूचनांचे पालन करून शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. या मोहिमेत शाळाबाह्य आढळलेल्या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत यावे, यासाठी पालकांची जनजागृती करण्यात आली आहे.

-कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर राहिलेली मुले. ४०