शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

जिल्ह्यातील एकाहत्तर मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ...

जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. कोरोनामुळे या शोध मोहिमेला मोठा फटका बसला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गत महिन्याच्या प्रारंभीच शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे काही दिवस ही मोहीम ठप्प होती. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाळेतील शिक्षकांनी ही शोध मोहीम जिल्हाभरात राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. शाळाबाह्य मुले राहू नयेत, सर्वांनी शिक्षण घ्यावे, लॉकडाऊन शिथिलतेनंतर शाळा सुरू झाल्या की मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी

जालना ००

अंबड २८

बदनापूर ००

भोकरदन ०१

घनसावंगी १७

जाफराबाद ०७

मंठा १८

परतूर ००

३१ मुले शाळेपासून दूरच

शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यातील ३१ मुले आजवर शाळेतच गेली नसल्याचे समोर आले आहे. यात घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ११, अंबड तालुक्यात ७, जाफराबाद तालुक्यात सात व मंठा तालुक्यात सहा मुले आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

सर्व शाळेतील शिक्षकांचा सहभाग

शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता. कोरोनातील सूचनांचे पालन करून हे सर्वेक्षण राबविण्यात आले. परंतु, या मोहिमेला यावर्षी कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. जालना व बदनापूर तालुक्यात एकही शाळाबाह्य मूल शोध मोहिमेत आढळलेले नाही.

अंबड तालुक्यात सर्वाधिक मुले

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत अंबड तालुक्यातील सर्वाधिक २१ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यात ७ मुले कधीच शाळेत न गेलेली तर २१ मुले ३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर असलेली आढळून आली आहेत. या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर नियमित शाळेत यावे, याबाबत शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

कोरोनातील सर्वच सूचनांचे पालन करून शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. या मोहिमेत शाळाबाह्य आढळलेल्या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत यावे, यासाठी पालकांची जनजागृती करण्यात आली आहे.

-कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर राहिलेली मुले. ४०