शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

जिल्ह्यातील एकाहत्तर मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ...

जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. कोरोनामुळे या शोध मोहिमेला मोठा फटका बसला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गत महिन्याच्या प्रारंभीच शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे काही दिवस ही मोहीम ठप्प होती. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाळेतील शिक्षकांनी ही शोध मोहीम जिल्हाभरात राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. शाळाबाह्य मुले राहू नयेत, सर्वांनी शिक्षण घ्यावे, लॉकडाऊन शिथिलतेनंतर शाळा सुरू झाल्या की मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी

जालना ००

अंबड २८

बदनापूर ००

भोकरदन ०१

घनसावंगी १७

जाफराबाद ०७

मंठा १८

परतूर ००

३१ मुले शाळेपासून दूरच

शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यातील ३१ मुले आजवर शाळेतच गेली नसल्याचे समोर आले आहे. यात घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ११, अंबड तालुक्यात ७, जाफराबाद तालुक्यात सात व मंठा तालुक्यात सहा मुले आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

सर्व शाळेतील शिक्षकांचा सहभाग

शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता. कोरोनातील सूचनांचे पालन करून हे सर्वेक्षण राबविण्यात आले. परंतु, या मोहिमेला यावर्षी कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. जालना व बदनापूर तालुक्यात एकही शाळाबाह्य मूल शोध मोहिमेत आढळलेले नाही.

अंबड तालुक्यात सर्वाधिक मुले

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत अंबड तालुक्यातील सर्वाधिक २१ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यात ७ मुले कधीच शाळेत न गेलेली तर २१ मुले ३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर असलेली आढळून आली आहेत. या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर नियमित शाळेत यावे, याबाबत शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

कोरोनातील सर्वच सूचनांचे पालन करून शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. या मोहिमेत शाळाबाह्य आढळलेल्या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत यावे, यासाठी पालकांची जनजागृती करण्यात आली आहे.

-कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर राहिलेली मुले. ४०