शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अ‍ॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, ...

यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अ‍ॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन प्रमुख पाहुणे राम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. बी.जी. श्रीरामे यांनी सत्काराला उत्तर देत असताना शेवटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या जीवनावरची ‘पेरणी’ नावाची एक कविता व महामानवांच्या जीवनावरची ‘गाणं भिमाचं’ नावाची एक कविता अशा दोन कविता त्यांनी सादर केल्या.

यावेळी राम गायकवाड म्हणाले की, गंगाधर पानतावणे यांच्या निधनानंतर राज्यातील परिवर्तनवादी साहित्यिकांना एक अस्मितेचे विचारपीठ राहिले नाही, ती उणीव लक्षात घेऊनच आम्ही जाणीव अस्मितेची साहित्य परिषद आपल्या राज्यात स्थापन केली आहे. या साहित्य परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शहरात भरवली जाणार आहेत. नव्या व जुन्या परिवर्तनवादी सर्व जाती-धर्मातील साहित्यिकांना हक्काचे हे बॅनर झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात शाखा होत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी लेखक डॉ. जानराव, कवी डी.के. शेख, पंडित कांबळे, प्रा. शिवाजी गायकवाड, जयराज खुणे, रवींद्र शिंदे, लेखक तात्यासाहेब माने, प्रा. महेंद्र चंदनशिवे आदी साहित्यिक उपस्थित होते.