शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अ‍ॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, ...

यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अ‍ॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन प्रमुख पाहुणे राम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. बी.जी. श्रीरामे यांनी सत्काराला उत्तर देत असताना शेवटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या जीवनावरची ‘पेरणी’ नावाची एक कविता व महामानवांच्या जीवनावरची ‘गाणं भिमाचं’ नावाची एक कविता अशा दोन कविता त्यांनी सादर केल्या.

यावेळी राम गायकवाड म्हणाले की, गंगाधर पानतावणे यांच्या निधनानंतर राज्यातील परिवर्तनवादी साहित्यिकांना एक अस्मितेचे विचारपीठ राहिले नाही, ती उणीव लक्षात घेऊनच आम्ही जाणीव अस्मितेची साहित्य परिषद आपल्या राज्यात स्थापन केली आहे. या साहित्य परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शहरात भरवली जाणार आहेत. नव्या व जुन्या परिवर्तनवादी सर्व जाती-धर्मातील साहित्यिकांना हक्काचे हे बॅनर झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात शाखा होत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी लेखक डॉ. जानराव, कवी डी.के. शेख, पंडित कांबळे, प्रा. शिवाजी गायकवाड, जयराज खुणे, रवींद्र शिंदे, लेखक तात्यासाहेब माने, प्रा. महेंद्र चंदनशिवे आदी साहित्यिक उपस्थित होते.