शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

पुनर्वसित गावांचे प्रश्न कायमचे निकाली काढण्यासाठी पुनर्वसन धोरण आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ; कोविड काळात जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे उत्कृष्ट काम लोकमत न्यूज नेटवर्क ...

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ; कोविड काळात जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे उत्कृष्ट काम

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : पुनर्वसित गावांचे असलेले प्रश्न कायमचे निकाली निघावेत, यासाठी पुनर्वसन धोरण लवकरच आणणार असल्याची माहिती राज्याचे इमाव बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन व मदत, पुनर्वसन विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री वडेट्टीवार म्हणाले, गेली अनेक वर्ष पुनर्वसन धोरण नसल्याने पुनर्वसित गावांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पुनर्वसित गावांचे असेलेले प्रश्न कायमचे निकाली निघावेत, या दृष्टीकोनातून पुनर्वसन धोरण तयार करण्यात आले असून, या धोरणाला मंजुरी मिळण्यासाठी ते येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जमीन खरेदीपासून ते गावांच्या सर्व नागरी सुविधांपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याने पुनर्वसित गावांचे असेलेले प्रश्न कायमचे निकाली निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोविड १९, पुनर्वसन विभाग, पशुसंवर्धन, नुकसान भरपाई आदीबाबत पॉवर पॉईंटच्या माध्यमातून मंत्री महोदयांना माहिती दिली.

अतिवृष्टीचा सर्वाधिक निधी जालना जिल्ह्याला

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यापैकी ५२२ कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी जालना जिल्ह्यासाठी देण्यात आला होता. या निधीपैकी ४६० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, उर्वरित निधीही नुकसानग्रस्तांना तातडीने वितरीत करण्याचे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले.

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य

कोरोना महामारीच्या काळामध्ये जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने अत्यंत संवेदनशीलपणे काम करत अत्यंत उत्कृष्टपणे परिस्थिती हाताळली. याबद्दल प्रशासनातील सर्व अधिकारी व आरोग्य सेवेतील प्रत्येकाचे कौतुक करत येणाऱ्या काळातसुद्धा सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यात याव्यात. कोविड काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्ह्याला साडेबारा कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी अतिरिक्त निधी लागल्यास तसा प्रस्ताव सादर करण्यात यावा, तो उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.