शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रेशीम कोषास विक्रमी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी रेशीम कोषास चालू हंगामातील सर्वांत विक्रमी ...

जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी रेशीम कोषास चालू हंगामातील सर्वांत विक्रमी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. विक्रमी भाव मिळाल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यासह खरेदीदाराचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी मराठवाड्यासोबतच विदर्भ, खान्देश आणि अहमदनगर जिल्ह्यांतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्यात सर्वप्रथम जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २१ एप्रिल २०१८ रोजी स्वतंत्र रेशीम कोष मार्केट कार्यान्वित केले. चालू वर्षात आजपर्यंत १४७१ शेतकऱ्यांनी १३९ टन रेशीम कोष विक्री केली असून ४ कोटी ९७ लाख रुपये एवढी रक्कम रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. गतवर्षी ऑगस्टअखेर २१० रुपये प्रतिकिलो दर होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून सरासरी ३६५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. तर आज धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास देशातील क्रमांक १ ची बाजारपेठ असलेल्या रामनगर ( कर्नाटक) च्या तोडीस विक्रमी असा ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शेतकरी कणसे यांच्यासह खरेदीदार इम्रान पठाण यांचा बाजार समितीतर्फे संचालक विष्णू चंद, सचिव रजनीकांत इंगळे, रेशीम अधिकारी अजय मोहिते यांनी सत्कार केला. यावेळी मोहन राठोड, अशोक कोल्हे, राहुल तायडे, गजानन जऱ्हाड आदींची उपस्थिती होती.

चौकट

सोन्याच्या तोडीस रेशीम कोषाला दर

कोष लागवडीकडे वळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण मराठवाड्यात प्रथम जालना बाजारपेठेत रेशीम मार्केट सुरू केले. या मार्केटमध्ये रेशीम कोषाला सोन्याच्या तोडीचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याचा आनंद असल्याचे माजी मंत्री तथा बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी सांगितले, तसेच कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपले कोष बाजारपेठेत विक्री करावेत, असे आवाहनही टोपे यांनी केले.