शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

घनसावंगी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ...

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही लवकरच पेरणी उरकली होती. घनसावंगी तालुक्यात यंदा ८२ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील सातही मंडलांत पडलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद रांजणी मंडलात झाली असून, या मंडलात ८९३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घनसावंगी मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, घनसावंगी मंडलात ८७५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अंतरवाली मंडलात ८१०.८ मि.मी., राणी उंचेगाव मंडलात ७५१.०५ मि.मी., तीर्थपुरी मंडलात ७३९.०५ मि.मी., कुंभार पिंपळगाव मंडलात ७६०.६ मि.मी., तर जांबसमर्थ मंडलात ७२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

घनसावंगी तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ओलांडली असून, आतापर्यंत तालुक्यात सरासरी ७९३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या वेळेपर्यंत ६१० मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

अतिवृष्टीमुळे बाणेगाव शिवारातील शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे, तर मंगरुळ येथील २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका बसला आहे. शिवाय गंगाकाठच्या उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. घनसावंगी शहरासह, बहीरगड, बोलेगाव, भद्रेगाव, रामगव्हाण, तणवाडी, राहेरा, देवहिवहरा, एकलेहरा, तीर्थपुरी, बोडक्या, खडका, मांदळा, म. चिंचोली, कु. पिंपळगाव, सिंदखेड, जांबसमर्थ, राजाटाकळी, घोन्सी, पारडगाव, आवलगाव, राजेगाव, रांजणी, राणी उंचेगाव, गुरपिंपरी, बोलेगाव, मंगुजळगावसह दुधना तिरावरील गावांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, सर्वच पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचनामे करण्याची मागणी

तलाव क्षेत्रातील पिके पूर्णतः पाण्यात बुडाली असून, पाच हजार हेक्टरवरील कापसाचे व चार हजार हेक्टर क्षेत्रावरील मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. शिवाय तुरीचे पीक पाण्याखाली बुडाल्याने उभे पीक जागीच सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.