शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

मालमत्ता सर्व्हेक्षणाचा घोळ कायम...!

By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST

जालना : गत काही वर्षांत शहरात नवीन वसाहतींची भर पडली आहे. मालमत्ता ८० हजारांवर गेल्या आहेत. एवढ्या मालमत्ताधारकांना

जालना : गत काही वर्षांत शहरात नवीन वसाहतींची भर पडली आहे. मालमत्ता ८० हजारांवर गेल्या आहेत. एवढ्या मालमत्ताधारकांना पालिका मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. तत्कालीन मालमत्ता सर्व्हेक्षण एजन्सीने तीन वर्षांत कोट्यवधींचा चुना लावला आहे. एकूणच नवीन व जुन्या सर्व्हेक्षण एजन्सींचा घोळ कायम आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरात ८० हजारांवर मालमत्ता असाव्यात. गत तीन वर्षांपूर्वी नागपूर येथील डबरासी या एजन्सीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले होते. या एजन्सीने मालमत्तांचे सर्व्हेक्षण बोगस केल्याचा आरोप आहे. यातच संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मालमत्तांच्या आखीव पत्रिकेत बदल करून परस्पर लाखो रूपये उचलून पालिकेचे अंदाजे २४ कोटी रूपयांचे नुकसान केले. यामुळे मालमत्ताधारकांकडून मिळणार करही पालिकेला मिळाला नाही. मिळाला तरी अल्प प्रमाणात. या कामांत पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचेही हात ओले झाल्याचे चर्चा आहे. डबरासी चुना लावत असल्याची पालिकेला उपरती झाल्यावर पालिकेने संबंधित एजन्सीचे काम थांबविले. काही दिवसांपूर्वी कोलब्रो या एजन्सीला पुन्हा नव्याने सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले असून, ही एजन्सी अत्याधुनिक उपकरणांद्वारे सर्व्हेक्षण करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. जुन्या एजन्सीने केलेला सर्व्हे, मोजलेल्या मालमत्ता व आता नवीन एजन्सीचे सर्व्हेक्षण यात मोठे गौडबंगाल आहे. डबरासीने तीन वर्षांत केलेल्या सर्व्हेक्षणाच्या नोंदी कोठे आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.