शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

बांबू वृक्षाचे रोपण ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

जालना : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत असून, या तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन ...

जालना : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत असून, या तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन प्रमुख बाबी कारणीभूत आहेत. तापमानवाढीचे होणारे परिणाम हानीकारक असून, मनुष्य जाती कायम टिकण्यासाठी वृक्ष लागवड हाच पर्याय आहे. इथेनॉल, वीजनिर्मितीमध्ये अधिक प्रमाणात उपयुक्त असण्याबरोबरच कमी खर्चात, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या बांबू या वृक्षांचे रोपण ही काळाची गरज बनली असल्याचे माजी आमदार पाशा पटेल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बांबू वृक्ष लागवड कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेला माजी आमदार तथा राष्ट्रीय ग्रामीण विकास एवं पंचायत संस्थेचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, रामेश्वर भांदरगे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे, डॉ. कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी आमदार पाशा पटेल म्हणाले, औद्योगिकीकरणामुळे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तसेच वृक्षांच्या तोडीमुळे वातावरणातील कार्बनचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते, त्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गाचा समतोल राखला जाऊन अधिक प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन कार्बनचे उत्सर्जन कमी करणाऱ्या बांबू वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्याची गरज आहे. बांबू वृक्ष हा अत्यंत कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा वृक्ष आहे. एका एकरमध्ये ५० टन बांबूची निर्मिती करता येणे शक्य असून, या वृक्षापासून वर्षाला २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत उत्पादन घेता येते. जालना जिल्ह्याचे वनक्षेत्र अवघे १.२७ टक्के एवढे असून, जिल्ह्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. जालना जिल्ह्यातून गोदावरी, दुधना केळणा, गिरिजा अशा नद्या वाहतात. या नद्यांच्या काठावर बांबू या वृक्षाची लागवड करण्याबरोबरच शासनाच्या पोखरा योजनेंतर्गतही बांबू वृक्षाची अधिकाधिक लागवड करून जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही यामुळे नक्कीच भर पडणार असल्याचे सांगत त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले, बांबू वृक्ष लागवड ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्याबरोबरच पर्यावरणाला अधिक फायदेशीर आहे. जालना जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, प्रत्येक तालुक्यात दर रविवारी एका एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येते. येणाऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गायरान जमिनीवर बांबू वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात यावे. या कार्यक्रमाकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता बांबू वृक्ष लागवड हे एक मॉडेल व्हावे, या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील प्रत्येक गावातून होतकरू अशा शेतकऱ्यांना एकत्रित करत या वृक्ष लागवडीचे महत्व त्यांना पटवून द्यावे, असे ते म्हणाले.

बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे यांनी बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तूंबरोबरच इमारतीचीही कशा प्रकारे उभारणी करण्यात येते, याची पॉवरपॉईंटच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.