शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

श्रीकृष्णनगरात २०१ झाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

पादचाऱ्यांची गैरसोय मंठा : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत ...

पादचाऱ्यांची गैरसोय

मंठा : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नगर पंचायतीने बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

बहरलेल्या पिकांना पावसाची गरज

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बहरात असलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पावसाच्या आशेवर पहिली पेर वाया गेल्याने नाईलाजाने परिसरातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पाऊस काही नियमित येईनासा झाल्याने दुबार पेर वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावली

राजूर : येथील शेतकरी कैलास हिरगुडे यांच्या लोणगाव शिवारातील शेतात सोमवारी दुपारी कोळपणीची कामे सुरू होती. दरम्यान, शेतातील खांबाला आधार देणाऱ्या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. या तारेला लोखंडी औताचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून बैलजोडी दगावली आहे. यात कैलास व त्यांचे भाऊ विलास या दोघांनाही विजेचा धक्का लागला. ते बाजूला फेकले गेले.

रोजगार मेळाव्याला तरुणांचा प्रतिसाद

परतूर : परतूर तालुक्यातील मांडवा देवी संस्थानात सोमवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेसचे युवा नेते नितीन जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक गजानन चवडे, योगेश मुळे, लक्ष्मण टेकाळे यांची उपस्थिती होती. मेळाव्यात विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुरेश गवळी, वैजनाथ गवळी, नारायण खोसे हे हजर होते.

पारध - पिंपळगाव रेणुकाई रस्ता उखडला

पारध : येथील पारध - पिंपळगाव रेणुकाई हा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात उखडला गेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच उर्दू शाळा ते पारध या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन महिन्यातच रस्ता उखडला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे पुन्हा काम करून द्यावे नसता, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.