शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी - डॉ. आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जालना : पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक ...

जालना : पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक डॉ. विलास आहेर यांनी केले आहे. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या २८३ व्या ऑनलाईन मासिक चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. आहेर यांनी जनावरांना अखाद्य वस्तू मुळे होणारे अपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना डॉ. आहेर म्हणाले की, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ३ डिसेंबर २००० रोजी झाली असून, त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. या विद्यापीठांतर्गत पाच महाविद्यालये असून, मुख्यालय नागपूर येथे आहे. जनावरांना अखाद्य वस्तूपासून शक्यतो दूर ठेवावे. अखाद्य वस्तूंमध्ये खिळा, सूई, चमडा, दोर, कपडे, तार यांचा समावेश होतो. या वस्तू् पोटात अडकतात व जनावरांना रोगी करतात. पोटफूगी, पोटाचा दाह, हरनिया या सारखे गंभीर आजार होतात. अघोरी उपाय जसे गळलिंबू पाजणे असे करू नये, यात वेळ वाया जातो व जनावरास गंभीर आजार जडतो, असेही ते म्हणाले.

परभणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कृषी शक्ती व यंत्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी यांनी शेतकऱ्यांना शेतीचे यांत्रिकीकरण व काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, जमिनीची मशागत करताना रोटाव्हेटरचे वापर कमी करणे गरजेचे आहे. रोटाव्हेटरचा अति वापरामुळे जमिनीचा टणकपणा वाढतो. त्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी होते. त्याचा मुळाच्या वाढीवर परिणाम होऊन पिकांची उत्पादकता कमी होत असते. अशा जमिनीवर सबसॉयलर वापरावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती होती.