शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी - डॉ. आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

जालना : पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक ...

जालना : पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक डॉ. विलास आहेर यांनी केले आहे. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या २८३ व्या ऑनलाईन मासिक चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. आहेर यांनी जनावरांना अखाद्य वस्तू मुळे होणारे अपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना डॉ. आहेर म्हणाले की, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ३ डिसेंबर २००० रोजी झाली असून, त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. या विद्यापीठांतर्गत पाच महाविद्यालये असून, मुख्यालय नागपूर येथे आहे. जनावरांना अखाद्य वस्तूपासून शक्यतो दूर ठेवावे. अखाद्य वस्तूंमध्ये खिळा, सूई, चमडा, दोर, कपडे, तार यांचा समावेश होतो. या वस्तू् पोटात अडकतात व जनावरांना रोगी करतात. पोटफूगी, पोटाचा दाह, हरनिया या सारखे गंभीर आजार होतात. अघोरी उपाय जसे गळलिंबू पाजणे असे करू नये, यात वेळ वाया जातो व जनावरास गंभीर आजार जडतो, असेही ते म्हणाले.

परभणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कृषी शक्ती व यंत्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी यांनी शेतकऱ्यांना शेतीचे यांत्रिकीकरण व काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, जमिनीची मशागत करताना रोटाव्हेटरचे वापर कमी करणे गरजेचे आहे. रोटाव्हेटरचा अति वापरामुळे जमिनीचा टणकपणा वाढतो. त्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी होते. त्याचा मुळाच्या वाढीवर परिणाम होऊन पिकांची उत्पादकता कमी होत असते. अशा जमिनीवर सबसॉयलर वापरावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती होती.