शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

पान तीन लहान बातम्या २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

भोकरदन : तालुक्यातील दगडवाडी, कठोरा बाजार, दानापूर, देहेड, मूर्तड आदी भागात रब्बीतील पिके जोमात आली आहेत. जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी ...

भोकरदन : तालुक्यातील दगडवाडी, कठोरा बाजार, दानापूर, देहेड, मूर्तड आदी भागात रब्बीतील पिके जोमात आली आहेत. जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी असल्याने याचा पिकांनाही लाभ होत आहे. मात्र, गत काही दिवसांपासून रब्बीतील पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे . अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

जामखेड येथे कार्यक्रम

अंबड : तालुक्यातील जामखेड येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले. युवकांनी शेतीकडे वळून शेतीपूरक व्यवसाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जामखेड आरोग्य केंद्रास ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सभापती सतीश होंडे, पल्लवी तार्डे, अशोक आघाव, देविदास कुचे, श्रीराम जाधव आदींची उपस्थित होती.

रस्ता दुरूस्तीची मागणी

जालना : शहरातील बालाजी चौकातून नवीन मोंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अपघाताचाही धोका वाढला आहे. वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याची दुरूस्ती केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

प्रकल्पात मुबलक पाणी

बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील प्रकल्पात सध्या मुबलक प्रमाणात पाणी आहे. या प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्याकडे भर दिला आहे. जवळपास दोनशे हेक्टरवरील शेतीसाठी पाण्याची मागणीही शेतकऱ्यांनी नोंदविली आहे. पाण्याचा जपून वापर व्हावा, यासाठी ठिबक, तुषार संचचा वापर होेणे गरजेचे आहे.