शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्सिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली ...

जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाअगोदर दररोज ४० ते ४५ खासगी ट्रॅव्हल्स ये-जा करत होत्या. रोज जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी पुणे, मुंबई, नागपूर यासह इतर शहरांमध्ये प्रवास करीत होते. परंतु, मागील वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी ने-आण करण्यासाठी मुभा दिली असली तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांचे पालन होते की नाही, याबाबत आमच्या प्रतिनिधींनी रिॲलिटी चेक केला असता, यात धक्कादायक बाब समाेर आली. जालना शहरातील बसस्थानक भागातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाहणी केली असता, बहुतांश प्रवासी विनामास्क होते, तर ट्रॅव्हल्समध्ये सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

ना मास्क, ना सॅनिटायझर

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी ट्रॅव्हल्समधून कमी प्रवासी प्रवास करीत असले तरी शासनाने नियमांचे पालन करण्याच्या सूचना ट्रॅव्हल्स मालकांना दिल्या आहेत. परंतु, ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दाखविली जात आहे. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी विनामास्क असल्याचे दिसून आले. शिवाय, सॅनिटायझरची व्यवस्थाही नसल्याचे पाहायला मिळाले.

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. याबाबत वाहतूक शाखेचे सपोनि. नाडे म्हणाले की, सध्या एकही ट्रॅव्हल्स सुरू नाही, त्यामुळे कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

ई-पास कोणाकडेही नाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परजिल्ह्यात प्रवास करायचा असले तर ई-पासची अट शासनाने ठेवली आहे. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची सक्ती करण्यात आलेली नाही. एका ट्रॅव्हल्स मालकाला विचारले असता, ते म्हणाले की, ई-पासची गरज नाही.