शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्सिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली ...

जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाअगोदर दररोज ४० ते ४५ खासगी ट्रॅव्हल्स ये-जा करत होत्या. रोज जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी पुणे, मुंबई, नागपूर यासह इतर शहरांमध्ये प्रवास करीत होते. परंतु, मागील वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी ने-आण करण्यासाठी मुभा दिली असली तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांचे पालन होते की नाही, याबाबत आमच्या प्रतिनिधींनी रिॲलिटी चेक केला असता, यात धक्कादायक बाब समाेर आली. जालना शहरातील बसस्थानक भागातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाहणी केली असता, बहुतांश प्रवासी विनामास्क होते, तर ट्रॅव्हल्समध्ये सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

ना मास्क, ना सॅनिटायझर

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी ट्रॅव्हल्समधून कमी प्रवासी प्रवास करीत असले तरी शासनाने नियमांचे पालन करण्याच्या सूचना ट्रॅव्हल्स मालकांना दिल्या आहेत. परंतु, ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दाखविली जात आहे. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी विनामास्क असल्याचे दिसून आले. शिवाय, सॅनिटायझरची व्यवस्थाही नसल्याचे पाहायला मिळाले.

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. याबाबत वाहतूक शाखेचे सपोनि. नाडे म्हणाले की, सध्या एकही ट्रॅव्हल्स सुरू नाही, त्यामुळे कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

ई-पास कोणाकडेही नाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परजिल्ह्यात प्रवास करायचा असले तर ई-पासची अट शासनाने ठेवली आहे. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची सक्ती करण्यात आलेली नाही. एका ट्रॅव्हल्स मालकाला विचारले असता, ते म्हणाले की, ई-पासची गरज नाही.