शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्सिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली ...

जालना : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाअगोदर दररोज ४० ते ४५ खासगी ट्रॅव्हल्स ये-जा करत होत्या. रोज जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी पुणे, मुंबई, नागपूर यासह इतर शहरांमध्ये प्रवास करीत होते. परंतु, मागील वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी ने-आण करण्यासाठी मुभा दिली असली तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांचे पालन होते की नाही, याबाबत आमच्या प्रतिनिधींनी रिॲलिटी चेक केला असता, यात धक्कादायक बाब समाेर आली. जालना शहरातील बसस्थानक भागातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाहणी केली असता, बहुतांश प्रवासी विनामास्क होते, तर ट्रॅव्हल्समध्ये सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

ना मास्क, ना सॅनिटायझर

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी ट्रॅव्हल्समधून कमी प्रवासी प्रवास करीत असले तरी शासनाने नियमांचे पालन करण्याच्या सूचना ट्रॅव्हल्स मालकांना दिल्या आहेत. परंतु, ट्रॅव्हल्स मालकांकडून या नियमांना तिलांजली दाखविली जात आहे. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी विनामास्क असल्याचे दिसून आले. शिवाय, सॅनिटायझरची व्यवस्थाही नसल्याचे पाहायला मिळाले.

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. याबाबत वाहतूक शाखेचे सपोनि. नाडे म्हणाले की, सध्या एकही ट्रॅव्हल्स सुरू नाही, त्यामुळे कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

ई-पास कोणाकडेही नाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परजिल्ह्यात प्रवास करायचा असले तर ई-पासची अट शासनाने ठेवली आहे. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची सक्ती करण्यात आलेली नाही. एका ट्रॅव्हल्स मालकाला विचारले असता, ते म्हणाले की, ई-पासची गरज नाही.