शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

३०० हेक्टरवर कांद्याचे बिजोत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

विष्णू वाकडे लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गतवर्षी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम रब्बीतील कांदा बिजोत्पादनावर ...

विष्णू वाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : गतवर्षी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम रब्बीतील कांदा बिजोत्पादनावर झाला आहे. सध्या जालना तालुक्यात जवळपास ३०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांदा बिजोत्पादन घेतले जात आहे.

गतवर्षी खरीप हंगामातील कांदा काढणीला येताच अधिकचा पाऊस झाला. त्यामुळे हाती आलेले कांद्याचे पीक वाया गेले होते. याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात कांदा बियाण्यांची उत्पादनासाठी मागणी वाढली. कांदा बियाण्याचे दर मध्यंतरी तब्बल प्रतिकिलो चार ते ४ हजार ५०० रूपये झाले होते.

हातवण येथील प्रगतशील शेतकरी संकेत बोरले म्हणाले, मागील चार ते पाच वर्षांमध्ये कांदा बियाण्याला प्रतिकिलो अ‌वघे एक हजार ते बाराशे रूपयांचा दर होता. परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा बियाण्याच्या दरात वाढ झाली. शिवाय पाऊसही समाधानकारक असल्यामुळे कांदा लागवड केली. एकरी खर्च वजा जाता १ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न कांदा बिजोत्पादनातून मिळेल, असेही ते म्हणाले. मंडल कृषी अधिकारी अजय सुखदेवे म्हणाले, गोलापांगरी मंडलातील कांदा बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून कांद्याच्या बिजोत्पादनाविषयी मार्गदर्शन घेतले आहे.

यंदा कांदा बिजोत्पादनासाठी वातावरणही पोषक आहे. मात्र, असे असले तरी बियाण्याचे योग्य परागिकरण होण्यासाठी मधमाशांचीही गरज तेवढीच आहे. सध्या तालुक्यात लागवड झालेल्यांपैकी अनेक बिजोत्पादनाचे प्लॉट बहरात आले आहेत. भाटेपुरी परिसरातील वडिवाडी, हातवण, कारला, खणेपुरी, पाचनवडगाव, वानडगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात कांदा बिजोत्पादन घेतले आहे.

वडिवाडी येथील प्रगतशील शेतकरी गजानन सोनवणे म्हणाले, मागील सात-आठ वर्षांपासून मी कांदा बिजोत्पादन घेत आहे. बिजोत्पादनामध्ये सातत्य ठेवल्याने फायदा होता. यंदा ४० क्विंटल कांदा लावला असून, सध्या तो चांगल्या स्थितीत आहे.

चौकट

तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे म्हणाले, जालना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा कांदा बिजोत्पादन घेण्याकडे कल आहे. तालुक्यात जवळपास ३०० हेक्टरवर कांदा बिजोत्पादनाची शेती केली जात आहे. उत्पादकांनी कांद्याला पाणी देताना नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी देताना सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करा‌वा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही गाडे यांनी सांगितले.