शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

जालना जिल्ह्यात एक हजार कोटींची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

विजय मुंडे जालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील तब्बल एक लाख ६२ हजार ...

विजय मुंडे

जालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील तब्बल एक लाख ६२ हजार ४९१ कर्जखाती कर्जमुक्त झाली आहेत. या कर्जखात्यावरील १०२० कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.

अस्मानी, सुलतानी संकटांचा फेरा, शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी या पार्श्वभूमीवर शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४० शेतकऱ्यांची कर्जखाती बँकांच्या वतीने शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. याद्यांच्या छाननीनंतर शासनाकडून सात याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांमध्ये एक लाख ७२ हजार ११७ शेतकऱ्यांचे कर्जखाते विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध करण्यात आले होते. शासनाकडून या याद्या आल्यानंतर तब्बल एक लाख ७२ हजार ११७ कर्ज खात्याचे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. आधार प्रमाणिकरण केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक लाख ६२ हजार ४९१ कर्ज खात्यावरील तब्बल १०२० कोटी ६५ लाख रूपयांची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली आहे. प्रमाणिकरण झालेल्या उर्वरित कर्जखात्यांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कर्जमुक्ती यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्याप ५ हजार ५८५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांची कर्जमुक्तीची रक्कम मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

४११७ ऑनलाईन तक्रारी

कर्जमुक्तीसाठी आजवर ४११७ जणांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या आहेत. जिल्हा समितीकडे प्राप्त तक्रारींपैकी २२४० तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, तर सात तक्रारी प्रलंबित आहेत. तालुकास्तरावर १८५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून, १८ तक्रारी प्रलंबित आहेत.

आधार प्रमाणिकरण करावे

ज्या शेतकऱ्यांची नावे शासनाकडून विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत समाविष्ट आहेत, त्या लाभार्थ्यांनी वेळेत आधार प्रमाणिकरण करावे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या वारसांनी बँकांच्या नियमानुसार कागदपत्रे सादर करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा.

नानासाहेब चव्हाण

जिल्हा उपनिबंधक, जालना