शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जालना जिल्ह्यात २०९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ कोटी रूपयांचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सहकार निबंधक एन.व्ही. आघाव यांनी दिली.जालना जिल्ह्याला चालू खरीप आणि रबी हंगामासाठी कृषी पत आराखड्यात एकूण एक हजार ४६८ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. पैकी खरीप हंगामात एक लाख २२ हजार शेतक-यांना जवळपास ८०३ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचेही आघाव यांनी सांगितले. यंदा पीककर्जाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तालुका निहाय तहसील, बँक आणि सहकार अशा तीनही विभागांचे एकत्रित मेळावे आयोजित केल्याने मोठा चांगला फरक पडला. पीककर्ज माफीनंतर नव्याने पीककर्ज देण्यासाठीची लगबग सुरू झाली होती. मात्र काही एक दोन बँका वगळता अन्य बँकांनी पीककर्ज वाटपासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्मचारी मागवून शेतक-यांना मदत केली.तयारी : रबी हंगामासाठी सरसावले शेतकरीशेतकºयांनी आता सोयाबीनवर नांगर फिरवून रबी हंगामासाठी शेतीची मशागत करण्याचे नियोजन केले असून, ज्वारी, गहू अणि हरभरा ही पिके लावण्यावर यंदा भर राहणार असल्याचे दिसून येते.कोरडवाहू शेतक-यांसाठी आता पूर्णपणे भिस्त ही परतीच्या पावसावर राहणार आहे.नवरात्रात ज्वारीची पेरणी झाल्यावर दोन ते तीन मोठे पाऊस पडल्यास ज्वारीची चिंता दूर होऊ शकते. मात्र ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था आहे, ते शेतकरी गहू आणि हरभरा लावण्यावर भर देत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेती