शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात २०९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ कोटी रूपयांचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सहकार निबंधक एन.व्ही. आघाव यांनी दिली.जालना जिल्ह्याला चालू खरीप आणि रबी हंगामासाठी कृषी पत आराखड्यात एकूण एक हजार ४६८ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. पैकी खरीप हंगामात एक लाख २२ हजार शेतक-यांना जवळपास ८०३ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचेही आघाव यांनी सांगितले. यंदा पीककर्जाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तालुका निहाय तहसील, बँक आणि सहकार अशा तीनही विभागांचे एकत्रित मेळावे आयोजित केल्याने मोठा चांगला फरक पडला. पीककर्ज माफीनंतर नव्याने पीककर्ज देण्यासाठीची लगबग सुरू झाली होती. मात्र काही एक दोन बँका वगळता अन्य बँकांनी पीककर्ज वाटपासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्मचारी मागवून शेतक-यांना मदत केली.तयारी : रबी हंगामासाठी सरसावले शेतकरीशेतकºयांनी आता सोयाबीनवर नांगर फिरवून रबी हंगामासाठी शेतीची मशागत करण्याचे नियोजन केले असून, ज्वारी, गहू अणि हरभरा ही पिके लावण्यावर यंदा भर राहणार असल्याचे दिसून येते.कोरडवाहू शेतक-यांसाठी आता पूर्णपणे भिस्त ही परतीच्या पावसावर राहणार आहे.नवरात्रात ज्वारीची पेरणी झाल्यावर दोन ते तीन मोठे पाऊस पडल्यास ज्वारीची चिंता दूर होऊ शकते. मात्र ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था आहे, ते शेतकरी गहू आणि हरभरा लावण्यावर भर देत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेती