शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही... घरीच उपचार घेऊन बरा होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

जालना : मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही, मी घरीच उपचार घेऊन बरा होईल, असे म्हणत अनेक जण घरीच थांबत ...

जालना : मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही, मी घरीच उपचार घेऊन बरा होईल, असे म्हणत अनेक जण घरीच थांबत आहेत. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. परिणामी, ग्रामीण भागात आजघडीला घराघरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. याची प्रशासनाला ही खबर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण निघत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवांना मुभा दिलेली आहे. शिवाय, नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहनही शासनाकडून केले जात आहेत ; परंतु ग्रामीण भागातील नागरिक दुखणे अंगावर काढत आहेत. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कोरोना चाचणी करीत नाहीत. घरीच थांबत असल्याने घरातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले बहुतांश जण आजारी पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. लोक घरीच आपापल्या पद्धतीने उपचार करीत असल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेच आजघडीला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

ग्राम दक्षता समित्या नावालाच

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या उपाययोजना गावात करण्यासाठी प्रत्येक ग्राम दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश गावांत ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे, तर काही गावांत अद्यापही ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली नाही. ज्या गावात ग्राम दक्षता समिती आहे त्या नावालाच आहेत.

ग्रामसेवकांचे ही दुर्लक्ष

गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती प्रशासनाला देण्याचे काम ग्रामसेवकाचे आहे ; परंतु ग्रामसेवक ही संबंधित माहिती प्रशासनाला देत नाही. त्यामुळे लोक घरीच उपचार घेत आहेत. गावात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

आकडेवारी

ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह २५,८३७

ग्रामीण भागातील मृत्यू ४०८