शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, ...

दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासह मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. परिणामी, येथे कामासाठी गेलेले लोक पुन्हा आपल्या गावी परत येत आहेत. या नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडून तपासणीदेखील केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जालना जिल्ह्यात २५ हजार ८६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २२ हजार ८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. असे असतानाही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहे.

दुसरीकडे बाहेरगावातून येणाऱ्यांची प्रशासनाकडून तपासणीच केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने बाहेरगावाहून येणाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.

बहुतांश लोक एसटी, ट्रॅव्हल्स व रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चार एसटी बसस्थानक

जालना जिल्ह्यात चार बसस्थानक आहेत. यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद यांचा समावेश आहे. या बसस्थानकात दररोज १०० ते १५० प्रवासी मुंबई, पुणे येथून येतात. त्यांची तपासणी केली जात नाही.

ट्रॅव्हल्स

मुंबई व पुण्याहून जालना येथे दररोज १० ते १२ ट्रॅव्हल्स येतात. या ट्रॅव्हल्सद्वारे दररोज ७० ते ८० प्रवासी जालना जिल्ह्यात येतात. त्या प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात नाही.

रेल्वेस्थानक

मुंबई व पुण्याहून जालना येथे येण्यासाठी दररोज ७० ते ८० प्रवासी येतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात नाही.