शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, ...

दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासह मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. परिणामी, येथे कामासाठी गेलेले लोक पुन्हा आपल्या गावी परत येत आहेत. या नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडून तपासणीदेखील केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जालना जिल्ह्यात २५ हजार ८६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २२ हजार ८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. असे असतानाही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहे.

दुसरीकडे बाहेरगावातून येणाऱ्यांची प्रशासनाकडून तपासणीच केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने बाहेरगावाहून येणाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.

बहुतांश लोक एसटी, ट्रॅव्हल्स व रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चार एसटी बसस्थानक

जालना जिल्ह्यात चार बसस्थानक आहेत. यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद यांचा समावेश आहे. या बसस्थानकात दररोज १०० ते १५० प्रवासी मुंबई, पुणे येथून येतात. त्यांची तपासणी केली जात नाही.

ट्रॅव्हल्स

मुंबई व पुण्याहून जालना येथे दररोज १० ते १२ ट्रॅव्हल्स येतात. या ट्रॅव्हल्सद्वारे दररोज ७० ते ८० प्रवासी जालना जिल्ह्यात येतात. त्या प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात नाही.

रेल्वेस्थानक

मुंबई व पुण्याहून जालना येथे येण्यासाठी दररोज ७० ते ८० प्रवासी येतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात नाही.