शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मतांपुरता मराठा समाजाचा वापर होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

फोटो महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजातील नेते मतांपुरतेच समाजाचा वापर करीत असल्याची टीका बाबाराजे देशमुख यांनी केली. मराठ्यांनी आंदोलने ...

फोटो

महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजातील नेते मतांपुरतेच समाजाचा वापर करीत असल्याची टीका बाबाराजे देशमुख यांनी केली. मराठ्यांनी आंदोलने ही हक्काच्या आरक्षणासाठी उभी केली असून, न्याय मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी दिला.

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बाबाराजे देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजातील मुलं-मुली शिक्षणामध्ये आरक्षण नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार येईल सरकार जाईल. सरकार म्हणजे तुम्ही-आम्ही जन्माला घातलेलं बांडगूळ असल्याचे सांगत त्यांनी मराठा समाजातील नेत्यांवरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीसाठी मावळा शब्द तयार केला. याच अठरापगड जातीतील एक जात म्हणजे मराठा. अशा मावळ्यांच्या जमिनी गुंठ्यावर व भूमिहीन झाल्याचे चित्र आहे. समाजातील मुलांना आरक्षण मिळावं यासाठी ५८ मोर्चे निघाले, ४२ लोकांनी समाजासाठी बलिदान दिले तरी सरकारला जाग येत नाही. मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्री, महामंडळ वाचविण्यासाठी धडपड करतात. परंतु समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत. इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजावर अन्याय झाला तर समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. परंतु मराठा समाजाचे स्वत:ला नेते म्हणणारे फक्त मतांपुरते समाजाचा वापर करीत असल्याची टीकाही देशमुख यांनी केली. अडचणीच्या काळात मराठा समाजाच्या पाठीमागे कोल्हापूर व साताऱ्याची गादी उभी असते, असे सांगत मराठा समाजाची न्याय मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाराज बोचरे यांनी, तर आभार आदिती तळेकर यांनी मानले. यावेळी साष्टपिंपळगाव व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

घोषणांनी दणाणला परिसर

यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एकच मिशन मराठा आरक्षण, एक लढाई समाजासाठी, समाजाच्या लोकांसाठी अशा घोषणा आंदोलक देत होते. आंदोलकांच्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.