शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

मतांपुरता मराठा समाजाचा वापर होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

फोटो महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजातील नेते मतांपुरतेच समाजाचा वापर करीत असल्याची टीका बाबाराजे देशमुख यांनी केली. मराठ्यांनी आंदोलने ...

फोटो

महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजातील नेते मतांपुरतेच समाजाचा वापर करीत असल्याची टीका बाबाराजे देशमुख यांनी केली. मराठ्यांनी आंदोलने ही हक्काच्या आरक्षणासाठी उभी केली असून, न्याय मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी दिला.

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बाबाराजे देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजातील मुलं-मुली शिक्षणामध्ये आरक्षण नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार येईल सरकार जाईल. सरकार म्हणजे तुम्ही-आम्ही जन्माला घातलेलं बांडगूळ असल्याचे सांगत त्यांनी मराठा समाजातील नेत्यांवरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीसाठी मावळा शब्द तयार केला. याच अठरापगड जातीतील एक जात म्हणजे मराठा. अशा मावळ्यांच्या जमिनी गुंठ्यावर व भूमिहीन झाल्याचे चित्र आहे. समाजातील मुलांना आरक्षण मिळावं यासाठी ५८ मोर्चे निघाले, ४२ लोकांनी समाजासाठी बलिदान दिले तरी सरकारला जाग येत नाही. मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्री, महामंडळ वाचविण्यासाठी धडपड करतात. परंतु समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत. इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजावर अन्याय झाला तर समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. परंतु मराठा समाजाचे स्वत:ला नेते म्हणणारे फक्त मतांपुरते समाजाचा वापर करीत असल्याची टीकाही देशमुख यांनी केली. अडचणीच्या काळात मराठा समाजाच्या पाठीमागे कोल्हापूर व साताऱ्याची गादी उभी असते, असे सांगत मराठा समाजाची न्याय मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाराज बोचरे यांनी, तर आभार आदिती तळेकर यांनी मानले. यावेळी साष्टपिंपळगाव व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

घोषणांनी दणाणला परिसर

यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एकच मिशन मराठा आरक्षण, एक लढाई समाजासाठी, समाजाच्या लोकांसाठी अशा घोषणा आंदोलक देत होते. आंदोलकांच्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.