शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

आयुष्य ‘लॉक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ ! ३० वर्षांत लीटरमागे ८२ रुपयांची वाढ !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

जालना : जिल्ह्यात गतवर्षीपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. असे असतानाही दिवसेंदिवस महागाई ...

जालना : जिल्ह्यात गतवर्षीपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. असे असतानाही दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर प्रतिदिन वाढत आहेत. पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून मागील ३० वर्षांत लीटरमागे ८२ रुपयांनी वाढ झाली आहे.

३० वर्षांपूर्वी लोक सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करीत होते. परंतु मागील काही वर्षांपासून प्रत्येक व्यक्ती स्वत:चे वाहन खरेदी करून प्रवास करीत आहे. त्यामुळे पेट्रोलचे दरही वाढत आहेत. १९९१ ला जिल्ह्यात १८ रुपये लीटरप्रमाणे पेट्रोलची विक्री होत होती. २००१ ला यात वाढ होऊन ३१ रुपये लीटरप्रमाणे पेट्रोल मिळत होते. २०११ नंतर सतत पेट्रोलचे दर वाढत आहेत. सध्या कोरोनामुळे हैराण असलेल्या नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत असून, नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

तेलाच्या किमती वाढल्या

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याचा परिणाम व्यवहारावर झाला असून सर्वजण हैराण झाले आहेत. अशा काळातही सतत तेलाचे दर वाढत आहेत. सध्या जिल्ह्यात सूर्यफूल तेल १८० प्रतिलीटरप्रमाणे विकले जात आहे. तर सोयाबीन १६०, करडीचे तेल २०५ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तेलाचे दर वाढल्याने बजेट कोलमडले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या काळातही महागाई वाढत आहे. पेट्रोल तर १०० रुपये लीटरप्रमाणे विकले जात आहे. त्यामुुळे वाहन विकून सायकलवर फिरण्याची वेळ आली आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे.

- युनूस सय्यद, वडीगोद्री

गेल्या काही वर्षांपासून महागाई वाढत आहे. खाद्यतेल, गॅस सिलिंडरबरोबरच आता पेट्रोलच्या दरातही वाढ होत आहे. प्रतिदिन दीडशे रुपये पेट्रोलसाठी खर्च करावे लागत आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे.

- गोरखनाथ कोल्हे, धाकलगाव

गेल्या वर्षापासून कोरोनाने हैराण करून सोडले आहे. त्यातच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने आता पुन्हा सायकलवर फिरावे लागत आहे. शासनाने कोरोनाच्या परिस्थितीत विचार करावा.

- अजय मासोळे, वडीगोद्री