शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

माणसे कमी, कामाचा व्याप जास्त; जिल्ह्यात जात पडताळणीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यात जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : जिल्ह्यात जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सेवा, निवडणूक उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे बहुतांशजण ऑनलाईन, तर काहीजण ऑफलाईन जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. परंतु, जात पडताळणी समितीकडे कमी मनुष्यबळ असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. गत महिन्यात जात पडताळणी समितीकडे ४,९८८ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी केवळ ६८२ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर ४,३०६ प्रकरणे प्रलंबित असल्याचे जात पडताळणी समितीकडून सांगण्यात आले आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र गरजेचे असते. परंतु, त्यांना ते वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

समितीकडील मनुष्यबळ

जालना येथील जात पडताळणी समिती कार्यालयात एक अध्यक्ष, एक उपायुक्त, एक सदस्य सचिव, पोलीस उपअधीक्षक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पोलीस कर्मचारी आदींची पदे भरण्यात आलेली आहेत. तर लघुलेखक श्रेणी, कनिष्ठ लिपिक यांची पदे रिक्त आहेत.

आठ दिवसांनंतर मिळतेय प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यांना आठ ते दहा दिवसांनंतर प्रमाणपत्र मिळते. अधिकारी व पदाधिकारी नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यास जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

गत महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज वाढले. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरी आम्ही संबंधितांना जात प्रमाणपत्र लवकर कसे दिले जाईल, यासाठी प्रयत्न करतो. आम्ही तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करू.

प्रदीप भोगले, सचिव

२५ रोज दाखल होणारी प्रकरणे

४,९०० एका महिन्यात दाखल प्रकरणे

६५ रोज निकाली निघणारी प्रकरणे

४,३०६ प्रलंबित असलेली प्रकरणे