शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

जालना नगर पालिकेत आघाडीत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:24 IST

जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे

राजेश भिसे/जालना : जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेतृत्व विविध निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांत नाराजीचा सूर आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे आपले गा-हाणे मांडून तिढा सोडविण्याची मागणी केली आहे. यावर आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एक वर्षापूर्वी जालना नगर पालिकेची निवडणूक झाली. यात निवडणूकपूर्व काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आघाडी झाल्यानंतर निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात आले. नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात आले. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. यात काँग्रेसची सरशी झाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने २८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागांवर यश मिळविले. पक्षीय बलाबलानुसार पालिकेत आघाडीने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करून सत्तेत आघाडीच्या नियमानुसार वाटा देण्यात आला. उपनगराध्यक्षपदासह दोन सभापती पदे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. सत्तेत वाटा मिळाला असला तरी विविध योजनांची कामे, महत्त्वाचे निर्णय आणि ठराव घेताना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांना आहे. काँग्रेसचे नेते अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पदाधिका-यांमध्ये आहे. विशेष म्हणजे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही लक्ष देत नसल्याने यात अधिकच भर पडत आहे. आघाडी असली तरी पालिकेत केवळ काँग्रेसचीच सत्ता असल्याचे भासवले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना काँग्रेसचे नेते फूस लावत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा राजकीय तिढा लवकरच सोडवावा लागणार आहे. अन्यथा पक्षवाढीस मर्यादा येऊन पक्षाची शक्ती क्षीण होण्याची चिन्हे आहेत..................................उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पण....शहरात पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता असून, यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जावेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची भूमिका आहे. याकडे काँग्रेसचे नेतृत्व लक्ष देत नसल्याचा या पदाधिका-यांचा आरोप आहे. काँग्रेस नेतृत्वाने कामांची विभागणी करून राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना कामांचे वाटप करावे, असे मत नाव न छापण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले................................पालिकेचा कारभार करताना सहकारी पक्षाला नेहमीच विश्वासात घेतले जात आहे. काही गैरसमज असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करुन दूर केले जातील. आघाडी म्हणूनच पालिकेचा कारभार केला जाईल.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, काँग्रेस...................................काँग्रेस नेत्यांशी काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा झाली असून, आघाडीच्या बोलणीनुसार पालिकेचा कारभार करण्याबाबत चर्चा झाली आहे. गैरसमज दूर करुन सत्तेतील वाटा आणि त्यानुसार अधिकार पक्षाच्या पालिकेतील सदस्यांना मिळवून दिले जातील.- आ. राजेश टोपे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, जालना....................................राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवून काँग्रेसला सहकार्य केले आहे. मात्र, विकासकामांचे नियोजन, योजनांची अंमलबजावणी आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. ते घेतले जावे.- राजेश राऊत, उपनगराध्यक्ष, जालना .