शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

जालना नगर पालिकेत आघाडीत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:24 IST

जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे

राजेश भिसे/जालना : जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेतृत्व विविध निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांत नाराजीचा सूर आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे आपले गा-हाणे मांडून तिढा सोडविण्याची मागणी केली आहे. यावर आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एक वर्षापूर्वी जालना नगर पालिकेची निवडणूक झाली. यात निवडणूकपूर्व काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आघाडी झाल्यानंतर निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात आले. नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात आले. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. यात काँग्रेसची सरशी झाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने २८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागांवर यश मिळविले. पक्षीय बलाबलानुसार पालिकेत आघाडीने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करून सत्तेत आघाडीच्या नियमानुसार वाटा देण्यात आला. उपनगराध्यक्षपदासह दोन सभापती पदे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. सत्तेत वाटा मिळाला असला तरी विविध योजनांची कामे, महत्त्वाचे निर्णय आणि ठराव घेताना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांना आहे. काँग्रेसचे नेते अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पदाधिका-यांमध्ये आहे. विशेष म्हणजे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही लक्ष देत नसल्याने यात अधिकच भर पडत आहे. आघाडी असली तरी पालिकेत केवळ काँग्रेसचीच सत्ता असल्याचे भासवले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना काँग्रेसचे नेते फूस लावत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा राजकीय तिढा लवकरच सोडवावा लागणार आहे. अन्यथा पक्षवाढीस मर्यादा येऊन पक्षाची शक्ती क्षीण होण्याची चिन्हे आहेत..................................उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पण....शहरात पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता असून, यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जावेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची भूमिका आहे. याकडे काँग्रेसचे नेतृत्व लक्ष देत नसल्याचा या पदाधिका-यांचा आरोप आहे. काँग्रेस नेतृत्वाने कामांची विभागणी करून राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना कामांचे वाटप करावे, असे मत नाव न छापण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले................................पालिकेचा कारभार करताना सहकारी पक्षाला नेहमीच विश्वासात घेतले जात आहे. काही गैरसमज असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करुन दूर केले जातील. आघाडी म्हणूनच पालिकेचा कारभार केला जाईल.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, काँग्रेस...................................काँग्रेस नेत्यांशी काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा झाली असून, आघाडीच्या बोलणीनुसार पालिकेचा कारभार करण्याबाबत चर्चा झाली आहे. गैरसमज दूर करुन सत्तेतील वाटा आणि त्यानुसार अधिकार पक्षाच्या पालिकेतील सदस्यांना मिळवून दिले जातील.- आ. राजेश टोपे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, जालना....................................राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवून काँग्रेसला सहकार्य केले आहे. मात्र, विकासकामांचे नियोजन, योजनांची अंमलबजावणी आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. ते घेतले जावे.- राजेश राऊत, उपनगराध्यक्ष, जालना .