शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जालना नगर पालिकेत आघाडीत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:24 IST

जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे

राजेश भिसे/जालना : जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेतृत्व विविध निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांत नाराजीचा सूर आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे आपले गा-हाणे मांडून तिढा सोडविण्याची मागणी केली आहे. यावर आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एक वर्षापूर्वी जालना नगर पालिकेची निवडणूक झाली. यात निवडणूकपूर्व काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आघाडी झाल्यानंतर निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात आले. नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात आले. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. यात काँग्रेसची सरशी झाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने २८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागांवर यश मिळविले. पक्षीय बलाबलानुसार पालिकेत आघाडीने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करून सत्तेत आघाडीच्या नियमानुसार वाटा देण्यात आला. उपनगराध्यक्षपदासह दोन सभापती पदे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. सत्तेत वाटा मिळाला असला तरी विविध योजनांची कामे, महत्त्वाचे निर्णय आणि ठराव घेताना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांना आहे. काँग्रेसचे नेते अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पदाधिका-यांमध्ये आहे. विशेष म्हणजे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही लक्ष देत नसल्याने यात अधिकच भर पडत आहे. आघाडी असली तरी पालिकेत केवळ काँग्रेसचीच सत्ता असल्याचे भासवले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना काँग्रेसचे नेते फूस लावत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा राजकीय तिढा लवकरच सोडवावा लागणार आहे. अन्यथा पक्षवाढीस मर्यादा येऊन पक्षाची शक्ती क्षीण होण्याची चिन्हे आहेत..................................उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पण....शहरात पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता असून, यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जावेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची भूमिका आहे. याकडे काँग्रेसचे नेतृत्व लक्ष देत नसल्याचा या पदाधिका-यांचा आरोप आहे. काँग्रेस नेतृत्वाने कामांची विभागणी करून राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना कामांचे वाटप करावे, असे मत नाव न छापण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले................................पालिकेचा कारभार करताना सहकारी पक्षाला नेहमीच विश्वासात घेतले जात आहे. काही गैरसमज असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करुन दूर केले जातील. आघाडी म्हणूनच पालिकेचा कारभार केला जाईल.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, काँग्रेस...................................काँग्रेस नेत्यांशी काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा झाली असून, आघाडीच्या बोलणीनुसार पालिकेचा कारभार करण्याबाबत चर्चा झाली आहे. गैरसमज दूर करुन सत्तेतील वाटा आणि त्यानुसार अधिकार पक्षाच्या पालिकेतील सदस्यांना मिळवून दिले जातील.- आ. राजेश टोपे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, जालना....................................राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवून काँग्रेसला सहकार्य केले आहे. मात्र, विकासकामांचे नियोजन, योजनांची अंमलबजावणी आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. ते घेतले जावे.- राजेश राऊत, उपनगराध्यक्ष, जालना .