शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

जालना : आज जो-तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात उपवासही करण्यावर अनेकांचा भर असतो; परंतु साबुदाण्यापासून आपल्या ...

जालना : आज जो-तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात उपवासही करण्यावर अनेकांचा भर असतो; परंतु साबुदाण्यापासून आपल्या शरीराला अधिक प्रमाणात कॅलरीज मिळतात. शिवाय शाबुदाणा पचनास जड असल्याने शारीरिक त्रासही होतो. त्यामुळे उपवासामध्ये शाबुदाण्याऐवजी भगर, दुधाचे पदार्थ यांसह इतर पौष्टिक पदार्थ समाविष्ट करणे अधिक फायदेशीर ठरणारे असते.

दर का वाढले?

सध्या बाजारपेठेत मालाची आवक कमी झाली आहे. त्यात कोरोनामुळेही व्यवहारावर मोठे परिणाम झाले आहेत. यामुळे बाजारपेठेत सध्या उपवासासाठी लागणारी भगर, साबुदाणा, नायलॉन शाबुदाण्यासह इतर खाद्यपदार्थांच्या दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगतात.

साबुदाण्यात कॅलरी अधिक, पचनास जड

साबुदाणा हा अन्नपदार्थ मानवी शरीरात पचण्यास विलंब होतो. शिवाय तो जड पदार्थ असतो. साबुदाण्यामध्ये अधिक कॅलरी असतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी करणाऱ्यांसाठी तो चांगला नाही. त्याशिवाय इतरही काही परिणाम शाबुदाणा खाल्ल्याने शरीरावर होत असल्याचे दिसून येते.

उपवास आहे, मग हे पदार्थ खा !

उपवास करीत असाल तर पौष्टिक पदार्थ खाल्लेले चांगले. यामध्ये भगर, राजगिरा, शिंगाडा, दूध व दुधाचे पदार्थ, शेंगदाणा लाडू हे पदार्थ उपवासाच्या दिवशी घ्यावेत. त्यामुळे शरीराला मोठा लाभ होतो. शिवाय भरपूर पाणी पिणेही फायरेशीर ठरते.

- डॉ. व्ही. व्ही. पिंगळे, आहारतज्ज्ञ