शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

रब्बीतील पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

लहान फोटो वडीगोद्री : अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या आशा असलेल्या रब्बी पिकांवरही आता लष्करी ...

लहान फोटो

वडीगोद्री : अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या आशा असलेल्या रब्बी पिकांवरही आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

अंबड तालुक्यात भौगोलिक क्षेत्र हे १,१६,७८३ हेक्टर असून, पेरणीलायक १ लाख ७ हजार २७३ हेक्टर क्षेत्र आहे. यात जिरायत ज्वारीचा १० हजार १९७ हेक्टर पेरा झालेला आहे. यंदा झालेल्या दमदार पावसामुळे वडीगोद्रीसह परिसरातील लहान-मोठ्या प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला आहे. जलस्तर उंचावल्याने बोअरसह विहिरींनाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह गहू, हरभरा आदी पिकांवर भर दिला आहे.

परिसरात ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. प्रारंभी पेरणी उरकलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकांची चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. मात्र, आता या पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. अळी पोग्यात शिरकाव करीत असल्याने ज्वारीचा संपूर्ण ठोंब जळून जात आहेत. त्यामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. परंतु कीटकनाशकांच्या किंमती शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. एकरी दीड हजारांचा खर्च येत असल्याने उत्पादन हाती पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडू लागले आहे.

प्रतिक्रिया

ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या हातून जातात की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

बाबासाहेब दखणे

शेतकरी, अंतरवाली सराटी

उपाययोजना कराव्यात

तालुक्यात ज्वारी पिकाचा समाधानकारक पेरा झाला आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर रोगराईसह अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून वेळीच उपायोजना कराव्यात. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.

सचिन गिरी, तालुका कृषी अधिकारी