शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना

By admin | Updated: October 12, 2016 23:49 IST

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गत चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झाला. मुगासह सर्वच पिकांचे उत्पादन चांगले निघाले. मुगाचे चांगले उत्पादन निघाल्याने नाफेडने शेतकऱ्यानां हमीभाव मिळावा म्हणून तात्काळ खरेदी केंद्र सुरू केले. बाजार समिती परिसरात हे केंद्र सुरू करण्यात आले. दीड महिन्यानंतर या केंद्रात फक्त १६ क्विंटल मुगाची आवक झाली. केंद्राकडून ५२२५ प्रति क्विंटलला भाव देण्यात येत आहे. हमीभावाची खात्री असली तरी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अल्प प्रतिसाद का मिळत आहे हे कोडेच आहे. प्रारंभीला मुगाची १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्याने केंद्राने मूग खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांनी येण्याचे टाळले. विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांकडून अडवणूक होऊ नये म्हणून केंद्र सुरू झाले. केंद्रात पाच कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा म्हणून शेतकऱ्यांना सूचनाही करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात दीड महिन्यात या केंद्रात फक्त १६ क्ंिवटल मुगाची आवक झाली. यंदा कडधान्य वर्ष असल्याने कृषी विभागाकडूनही तूर, मूग, उडीद आदी कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर वरूणराजाने कृपा केल्याने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मुगाचे पीक जोमात आले आहे. जालना बाजार समितीतही दिवसाकाठी पाचेश ते हजार क्विंटल मुगाची आवक वाढत आहे. त्याचबरोबर तालुकास्थानच्या बाजार समितीही मुगाची आवक चांगली होत आहे. हमीभाव केंद्रात तीन प्रकारांत मुगाची खरेदी केली जाते. त्यात पूर्ण वाळलेला, मध्यम वाळलेला असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांना पूर्णपणे वाळलेला मूग आणत नसल्याने या हमीभाव केंद्रात आवक कमी आहे.