शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेने प्राचीन मूर्तीवेशीची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST

निजाम सरकारचे वर्चस्व असल्याने येथे जहागीर होती. असे जुने जाणकार सांगतात. शहरात एकूण आठ ते दहा प्रमुख वेशी होत्या. ...

निजाम सरकारचे वर्चस्व असल्याने येथे जहागीर होती. असे जुने जाणकार सांगतात. शहरात एकूण आठ ते दहा प्रमुख वेशी होत्या. परंतु, त्या काळाच्या ओघात नामशेष झाल्या आहेत. यातील पहिली वेस ही जुना जालना भागातील कचेरीरोड येथून शहरात प्रवेश करताना असलेली मुक्तेश्वर वेस होय, आज या वेशीवरील घुमट आणि दरवाजे अस्तित्वात नाहीत. परंतु त्याच्या खुणा येथे कायम आहेत. दुसरी वेस ही अंबडवेस म्हणून ओळखली जात होती. ती देखील आज अस्तित्वात नाही. आज घडीला कादराबाद भागातील पाणीवेस चांगल्या स्थितीत असून, मूर्तीवेस ही देखील बऱ्यापैकी मजबूत होती. परंतु, शुक्रवारी एका ट्रकने धडक दिल्याने त्या वेशीचा वरील भाग कोसळला आहे, तसेच बांधकामालाही तडे गेले आहेत.

यापाठोपाठ दर्गावेस ही देखील चांगल्या स्थितीत आहेे. एकूणच या चांगल्या अवस्थेत आहेत. दरम्यान, मूर्तीवेस तसेच दर्गावेस आणि पाणीवस ही अवखाफ बोर्डाच्या अखत्यारीखाली येतात. त्यामुळे बोर्डाने जालना पालिकेला पत्र दिल्यास त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करता येऊ शकते, अशी माहिती पालिकेचे अभियंता सैय्यद सौद यांनी सांगितली.

चौकट

पालिकेने केला रस्ता बंद

पाणीवेशीतून शिवाजी पुतळा परिसरात जाण्यासाठी पाणीवेस आणि त्याच्यापुढे मूर्तीवेस होती. परंतु, शुक्रवारी रात्री एका ट्रकने या वेशीला जोरदार धडक दिल्याने या वेशीचा काही भाग निखळल्याने या वेशीतून होणारी वाहतूक पालिकेने टीनपत्रे ठोकून बंद केली आहे. तसेच पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर तसेच अभियंता सैय्यद शेख यांनी या भागात भेट देऊन लहान मुलांनाही या भागात जाऊ न देण्याचे आवाहन केले.

औरंगाबाद पॅटर्नची गरज

ज्याप्रमाणे औरंगाबाद शहरातील भडकल गेट, पैठण गेट या जुन्या वेशींचे ज्या पद्धतीने संरक्षण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर जालन्यातील वेशींचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हा निजामकालीन ठेवा जपल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासह ऐतिहासिक ठेवाही जतन होऊ शकतो, अशी नागरिकांची मागणी आहे.