शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

घनसावंगी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

अंबड गटसाधन केंद्रातर्फे कार्यशाळा अंबड : शालेय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व गटसाधन केंद्राच्या वतीने ...

अंबड गटसाधन केंद्रातर्फे कार्यशाळा

अंबड : शालेय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व गटसाधन केंद्राच्या वतीने सुखापुरी व झिरपी केंद्रांतर्गत शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात डायटचे अधिव्याख्याता प्रा. जालिंदर बटूळे, विनोद राख, साधनव्यक्ती सतीश देशमुख, अशोक पवार, केंद्रप्रमुख अशोक पटेकर, म्हस्के, प्रगती बांगर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आश्रुबा गवई यांनी केले.

शिवसंग्राम पक्षातर्फे मागण्यांचे निवेदन

जालना : मुंबई येथे १९ सप्टेंबर रोजी शिवसंग्राम तसेच इतर मराठा संघटना आणि प्रमुख समन्वय यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजाणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरूवारी केली आहे. या निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष निलेश गोर्डे, नारायण टकले, तालुकाध्यक्ष सचिन खरात, भारत राजबिंडे, राजेश शेळके, नवनाथ राजबिंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पारनेर येथे धार्मिक कार्यक्रम

अंबड : तालुक्यातील पारनेर येथे आरबडी भजनी मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासह भांड्यावरील भजन स्पर्धा घेण्यात आल्या. यात विविध ग्रंथांचे विजेत्यांना वाटप करण्यात आले. पारनेर येथे गुरूवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पारनेर सह लालवाडी, पारनेरतांडा, मार्डी, कर्जत, शिराढाेण आदी भागातील भाविक सहभागी झाले होते.

पारध परिसरात

पिके बहरली

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पारध येथे गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यातच बुधवारी सकाळपासूनच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या श्रावण सरी कोसळत होत्या. त्यामुळे परिसरातील वातावरण निसर्गरम्य होऊन वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

घनसावंगी : भोकरदन तालुक्यातील रांजणी येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे ही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांसह जनावरांनाही या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.