शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

ऑटोपार्ट दुकानासह गॅरेजला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST

ॲड.कोल्हे यांचा सत्कार जालना : जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी ॲड.दीपक ...

ॲड.कोल्हे यांचा सत्कार

जालना : जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी ॲड.दीपक कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप

जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ जयंती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी पांजरपोळ गोशाळेत चारावाटप करण्यात आला. यावेळी रवींद्र राऊत, सुभाष देवीदान, रवींद्र डुरे, सतीश जाधव, विजयकुमार पंडित, गणेश सुपारकर, अंकुश राऊत, दिगंबर पेरे आदींची उपस्थिती होती.

आगार प्रमुखांना विविध मागण्यांचे निवेदन

आष्टी : परतूर तालुक्यातील फुलवाडी ते आष्टी मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या मागणीचे निवेदन परतूर आगार प्रमुख दिगंबर जाधव यांना देण्यात आले. या निवेदनावर महादेव वाघमारे, सोपान वाघमारे, परमेश्वर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ वाघमारे, नागनाथ वाघमारे, केशव वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हाध्यक्षपदी विश्वंभर कुलकर्णी

जालना : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वंभर कुलकर्णी, संघटकपदी विनोद पाटील, सहसंघटकपदी शालिनी पुराणिक यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा ग्राहक पंचायत जालनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे, सचिव महेश धन्नावत, जिल्हा संघटक संजय देशपांडे, अ‍ॅड.शुभम भारुका, डॉ.दिलीप लाड, मो.नूर आदी उपस्थित होते.

क्षयरोगमुक्तीवर विशेष कार्यक्रम

भोकरदन : केदारखेडा येथील श्री रामेश्वर विद्यालयात क्षयरोगमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एम.एन. सुटे, एस.एस. खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्ही.एन. धसाळ, के.के. सोरमारे, पी.बी. इंगळे, नितीन तळेकर, संदीप पोटे, केशव खेडेकर, विजय वाघ, श्रीराम मुरकुटे, मिलिंद सावंत, आर.के. जाधव, विनोद तांगडे, टी.आर. फोलाने आदी उपस्थित होते.

कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांनी सक्तीच्या कर्जवसुलीला सुरुवात केली आहे. वसुली पथके थेट कर्जदाराच्या घरी जाऊन वसुली करीत असल्याने कर्जदार त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या काळात तब्बल सहा महिने उद्योग, कामधंदे बंद होते. त्यातच आता विजेचे बिल, कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी कर्जदारांनी केली आहे.

रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले

जळगाव सपकाळ: येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ अंधारात आहेत. महावितरणकडे वारंवार तक्रार देऊनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जळगाव सपकाळ येथे संपूर्ण गावात पाच ठिकाणी सिंगल फेज रोहित्र बसविण्यात आले आहेत. पाच रोहित्रांपैकी दररोज अथवा दिवसाआड कोणत्या ना कोणत्या ठिकाणचे रोहित्र जळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालय त्रस्त झाले आहे.