शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

ऑटोपार्ट दुकानासह गॅरेजला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST

ॲड.कोल्हे यांचा सत्कार जालना : जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी ॲड.दीपक ...

ॲड.कोल्हे यांचा सत्कार

जालना : जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी ॲड.दीपक कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप

जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ जयंती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी पांजरपोळ गोशाळेत चारावाटप करण्यात आला. यावेळी रवींद्र राऊत, सुभाष देवीदान, रवींद्र डुरे, सतीश जाधव, विजयकुमार पंडित, गणेश सुपारकर, अंकुश राऊत, दिगंबर पेरे आदींची उपस्थिती होती.

आगार प्रमुखांना विविध मागण्यांचे निवेदन

आष्टी : परतूर तालुक्यातील फुलवाडी ते आष्टी मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या मागणीचे निवेदन परतूर आगार प्रमुख दिगंबर जाधव यांना देण्यात आले. या निवेदनावर महादेव वाघमारे, सोपान वाघमारे, परमेश्वर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ वाघमारे, नागनाथ वाघमारे, केशव वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हाध्यक्षपदी विश्वंभर कुलकर्णी

जालना : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वंभर कुलकर्णी, संघटकपदी विनोद पाटील, सहसंघटकपदी शालिनी पुराणिक यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा ग्राहक पंचायत जालनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे, सचिव महेश धन्नावत, जिल्हा संघटक संजय देशपांडे, अ‍ॅड.शुभम भारुका, डॉ.दिलीप लाड, मो.नूर आदी उपस्थित होते.

क्षयरोगमुक्तीवर विशेष कार्यक्रम

भोकरदन : केदारखेडा येथील श्री रामेश्वर विद्यालयात क्षयरोगमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एम.एन. सुटे, एस.एस. खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्ही.एन. धसाळ, के.के. सोरमारे, पी.बी. इंगळे, नितीन तळेकर, संदीप पोटे, केशव खेडेकर, विजय वाघ, श्रीराम मुरकुटे, मिलिंद सावंत, आर.के. जाधव, विनोद तांगडे, टी.आर. फोलाने आदी उपस्थित होते.

कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांनी सक्तीच्या कर्जवसुलीला सुरुवात केली आहे. वसुली पथके थेट कर्जदाराच्या घरी जाऊन वसुली करीत असल्याने कर्जदार त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या काळात तब्बल सहा महिने उद्योग, कामधंदे बंद होते. त्यातच आता विजेचे बिल, कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी कर्जदारांनी केली आहे.

रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले

जळगाव सपकाळ: येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ अंधारात आहेत. महावितरणकडे वारंवार तक्रार देऊनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जळगाव सपकाळ येथे संपूर्ण गावात पाच ठिकाणी सिंगल फेज रोहित्र बसविण्यात आले आहेत. पाच रोहित्रांपैकी दररोज अथवा दिवसाआड कोणत्या ना कोणत्या ठिकाणचे रोहित्र जळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालय त्रस्त झाले आहे.